कळवा खाडीतील झोपड्यांवर ठाणे पालिकेची कारवाई; ६५ झोपड्या जमीनदोस्त

Spread the love

महापालिका प्रशासनाने गुरुवारी झोपड्या हटविण्याची मोहिम हाती घेतली. यामध्ये दिवसभरात ६५ झोपड्या हटविण्यात आल्या असून नागरिकांच्या विरोधाला न जुमानता पालिकेच्या पथकाने बेधडक ही कारवाई केली.

ठाणे: ठाणे शहराचे गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. शहराची लोकसंख्या २० लाखांच्या घरात गेली आहे. शहरात रस्ते बांधणी, उड्डाण पुल उभारणी, सॅटीस पुल, तलावांचे सुशोभिकरण, असे अनेक प्रकल्प महापालिकेकडून राबविले जात आहे. ठाणे शहराला ३२ किमीचा खाडी किनारा लाभलेला आहे. या भागातील खारफुटीवर भराव टाकून त्यावर बेकायदा बांधकामे उभारणीचे प्रकार भुमाफियांकडून गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. कळवा, साकेत परिसरात खाडी बुजवून त्याठिकाणी बेकायदा झोपड्या उभारण्यात आल्या आहेत

खाडी पात्रापर्यंत या झोपड्या पोहचल्या आहेत. याठिकाणी दुमजली झोपड्या उभारण्यात येत असल्याने मोठी जिवीतहानी होण्याची भिती व्यक्त होत होती. तसेच खाडीचे पात्र अरुंद होण्याबरोबरच अतिक्रमणामुळे खारफुटी नष्ट झाल्याने पुराचा धोका निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस या झोपड्यांची संख्या वाढत असून यामुळे खाडीचे पात्र अनेक ठिकाणी अरुंद झाले आहे. या झोपड्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत होते. यावर सामजिक कार्यकर्ते तसेच कांदळवन जतन या सारख्या संस्थांच्या पाठपुराव्यामुळे ठाणे महापालिकेने गुरूवारपासून झोपड्यांवर कारवाई सुरु केली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page