
गॅसचे शिफ्टिंग चे काम चालू असल्याने मुंबई गोवा हायवे गेली बारा तासाहून अधिक बंद आहे. रत्नागिरी कडे जाणाऱ्या गाड्या परत वळवण्यात आलेले आहेत. अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.
रत्नागिरी प्रतिनिधी- सकाळी साडेसात वाजता मुंबई गोवा हायवे वरती टँकर व मिनीबस यांचा अपघात झाला. सदर अपघातामध्ये 29 जण जखमी झालेले असून मुंबई गोवा हायवे आठ तासाहून अधिक काळ बंद आहे. सदर अपघात होण्यापूर्वी एक महिना अगोदरपासूनच ईगल कंपनीचे कर्मचारी आणि राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडे ग्रामस्थांनी स्पीड ब्रेकर करण्यासंदर्भामध्ये मागणी केली होती परंतु सदर बाबीकडे कॉन्ट्रॅक्टरने दुर्लक्ष केल्याने सदरचा मोठा अपघात घडला आहे. सदर अपघातामध्ये टँकर चालक दोशी असला तरी तेवढाच दोषी कॉन्ट्रॅक्टर हे आहे असे ग्रामस्थ आमचे म्हणणे आहे. सदर अपघाताच्या वेळेला ग्रामस्थ संतप्त झाले होते. घरच्या टँकरचा स्पोर्ट झाला असता तर प्रचंड मोठ नुकसान झाले असते. त्याला जबाबदार कोण असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गोव्यावरून मुंबईकडे जाताना बावनदी शेजारी ब्रिजचे काम चालू आहे. तीव्र उतार वळण असल्याने जिथे पर्यंतचा रस्ता पूर्ण झाला आहे तिथून पुढे कच्चा रस्ता आहे. सदर ठिकाणी गाडी येताना गाडी स्पीडनी येते . त्यामुळे गाडी कंट्रोल होत नाही. त्यामुळे सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात झालेले आहेत. सदरचे हो अपघात होत असल्याने सूचनेचा फलक आणि डीवायडेशनचा फलक लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केलेली होती. चे स्पीड बेकर करण्याची ही मागणी ग्रामस्थांनी केली होती. परंतु कॉन्ट्रॅक्टर व सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही.
गेल्या महिनाभरात आठ एक्सीडेंट तीन जणांचे मृत्यू…
मुंबई गोवा हायवे वरती निवळी ते बावनदी दरम्यान बावनदी पुलाचे काम चालू आहे . सदर पुलाचे काम युद्ध पातळीवर चालू असून पलीकडे जाणारा बायपास पर्यंत काँक्रीट चा रस्ता पूर्ण झालेला आहे. बावनदी पासून सदर ठिकाण पर्यंत रस्ता कच्चा आहे. सदर ठिकाणी आजपर्यंत आज आठ एक्सीडेंट झालेले आहेत. सदर अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झालेला असून बाकी लोक किरकोळ जखमी झाले होते. यापूर्वी स्टील ने भरलेल्या गाडीचा अपघात झाला त्यामध्ये एक चालक व एक किनर मृत्यू झाला होता. त्यानंतर झालेल्या चिरा भरलेल्या गाडीचा अपघाता मध्ये चालकाच्या बायकोचा मृत्यू झाला होता. व बाकीच्या अपघातामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. प्रत्येक वेळेला ग्रामस्थ मदत करतात परंतु ग्रामस्थांनी केलेल्या सूचनेचे पालन कॉन्ट्रॅक्टर किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडून करण्यात आलेले नाही. त्यामुळे अशा घटना होत आहेत.
डांबरीकरण करून स्पीड बेकर बसवण्याची ग्रामस्थांची मागणी…
बावनदी येथील लोहारांचे दुकान ते पाली ला जाणारा बायपास असलेल्या कच्च्या रस्त्याचे डांबरीकरण करून स्पीड बेकर बसवण्याची मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे. सदर ठिकाणी संरक्षणासाठी तात्पुरते स्टील गार्ड लावावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे. सदर ठिकाणी उपाययोजना केल्या असत्या तर एवढा मोठा अपघात घडला नसता असे ग्रामस्थांनी सांगितले.
अपघात ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गायब…
सदरचा अपघात झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरची माणसे कोणी हजर नव्हते. कॉन्ट्रॅक्टरचा राठोड सोडल्यास कोणी अधिकारी सदर ठिकाणावरून येऊन गेलेले नाही. ज्यांची जबाबदारी आहे ते राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारीही सदर ठिकाणी उपस्थित नव्हते. अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. आज पर्यंतच्या प्रत्येक अपघातामध्ये कॉन्ट्रॅक्टर कडून कधीही स्वतःहून माणसे पुढे येत नाहीत. सदर वेळेला पवार यांनी कॉन्ट्रॅक्टरच्या माणसाला फोन केल्यानंतर दोन पाण्याच्या टँकर पाठवण्यात आले. हायवे प्रशासनावर लोक नाराज असून सांगितलेल्या उपाययोजना केला नाही तर तीव्र आंदोलन करणार असल्याचे विष्णू पवार यांनी सांगितले.
” मुंबई गोवा हायवे वरती सदर ठिकाणी आठ अपघात झालेला असून त्यामध्ये तीन माणसांचा मृत्यू झाला आहे. ईगल कंपनीचे मॅनेजर अधिकारी प्रेम गर्ग यांना सदर ठिकाणी कच्चा रस्त्याची डांबरीकरण करून स्पीड ब्रेकर लावावेत. गाड्यांचे स्पीड कमी करण्याचे बोर्ड लावावेत अशी मागणी मी केली होती. परंतु सदरच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने एवढा मोठा अपघात झाला आहे. सदरचा अपघात झाल्यानंतर अग्निशमन दलाल चा फोनवर फोन केला तसेच पोलिसांनाही कळवले. प्रत्येक वेळेला ग्रामस्थ जीवाचे रान करून मदत करतात परंतु अधिकारी वर्ग कधीही ग्रामस्थांच्या सूचना पाळत नाहीत. स्थानिक नागरिकांनी प्रवाशांना पाण्याची व नाष्ट्याची सोयही केली आहे .सांगितलेल्या सूचनांचे पालन न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचे मी आज रोजी प्रशासनांना इशारा देत आहे.”- विष्णू पवार. प्रदेश उपाध्यक्ष, शिवसेना भटके विमुक्त प्रदेश कमिटी महाराष्ट्र.