
ठाणे: प्रतिनिधी (निलेश घाग) आज सकाळी दिवा रेल्वे स्थानकात झालेल्या महिलांच्या उद्रेकानंतर रेल्वे पोलिसांकडून या महिलांवर कारवाई करून त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. याची माहिती मिळाल्यानंतर मनसेचे दिवा शहर अध्यक्ष तुषार भास्कर पाटील यांनी सहकाऱ्यांसोबत पोलीस अधिकारी श्री.तिवारी साहेबांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. माहिलांचा झालेला उद्रेक का पूर्वनियोजित नसून,त्यावेळी झालेली एक नैसर्गिक प्रतिक्रिया होती असे त्यांनी तिवारी साहेबांच्या निदर्शनास आणून दिले. दिव्यातील रेल्वे प्रवाशांना या असंख्य अडचणींचा रोजच सामना करावा लागतो,विशेषतः महिलांना त्याचा जास्त त्रास होतो.

मुंबईला जाणाऱ्या फलाटांची दिशा बद्दलल्यापासून तर दिवेकारांना लोकल मध्ये चढायलाच मिळत नाही, डोंबिवली वरून येणारे प्रवासी ज्यांना ठाण्याला उतरायचे असते ते दिव्यातील प्रवाशांना चढुच देत नाही हा मुद्दा त्यांनी लक्षात आणून दिला. या महिलांना अखेर दुपारी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. यावेळी याठिकाणी दिवा गावचे पोलीस पाटिल श्री.प्रशांत उत्तम पाटील, श्री.तुषार पाटील श्री.प्रशांत गावडे तसेच दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ऊपस्थित हे देखील यावेळी उपस्थित होते.
जाहिरात

जाहिरात



