संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं नाशिकमध्ये उत्स्फुर्त स्वागत …

Spread the love

नाशिक – त्र्यंबकेश्वरकडून पंढरपूरकडं निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचं आज (22 जून) नाशिकमध्ये महापालिका, जिल्हा प्रशासनाच्या वतीनं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं. विठुरायाच्या ओढीनं दरवर्षी लाखो वारकरी संत निवृत्तीनाथ पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होतात. आषाढी वारीसाठी श्री संत निवृत्तीनाथांची पालखी परंपरेनं त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडं गुरुवारी (20 जून) निघाली. सातपूर येथे मुक्काम झाल्यानंतर पंचायत समिती कार्यालय परिसरात नाशिक महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं वारकऱ्यांचं स्वागत करण्यात आलं. यानंतर वारकरी टाळ-मृदंगाच्या गजरात पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाले. निवृत्तीनाथ दिंडी सोहळ्यात दरवर्षी 70 ते 80 हजार भाविक वारकरी सहभागी होत असतात. निवृत्तीनाथांच्या पालखीतलं पहिलं गोल रिंगण सिन्नर जवळील दातली येथे पार पडणार आहे. यावेळी हजारो वारकरी हरिनामाच्या गजरात, टाळ मृदंगाच्या तालात फेर गोल रिंगण धरत विठुरायाच्या नामाचा जयजयकार करतील.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page