
असगणी ग्रामस्थांनी तोंडावर काळी पट्टी बांधून मूक मोर्चा काढला होता.लोटेतील मोर्चाप्रकरणी सुमारे ४५० जणांवर गुन्हा दाखल, कशासाठी काढला होता मोर्चा.. वाचा सविस्तर
खेड : तालुक्यातील असगणी येथील अतिरिक्त लोटे औद्योगिक वसाहतीत होऊ घातलेल्या हिंदुस्तान कोकाकोला कंपनीमध्ये स्थानिक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळत नसल्याने असगणी ग्रामस्थांनी गुरुवारी (५ जून) तोंडावर काळी पट्टी बांधून मूक मोर्चा काढला होता. या प्रकरणी मनाई आदेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवत सरपंच संजना संजय बुरटे, उपसरपंच यासिन फरीक घारे यांच्यासह सुमारे ४५० जणांवर येथील पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये प्रमोद पांडुरंग चांदिवडे, चंद्रकांत राजाराम गोसावी, सुवींद्र रामचंद्र धाडवे, शाहीन इस्माईल कादरी, रिया सचिन बाईत, मेघना भाऊ नायनाक, चेतन चंद्रकांत पवार, संजय सखाराम बुरटे, अनंत विठ्ठल नायनाक, इस्माइल हसन कादरी, हुसेन करीम ठाकुर, विवेक वासुदेव नायनाक, जावेद जब्बार आंबेडकर, रवींद्र सखाराम बुरटे, रविना रवींद्र बाईत, श्रीकांत आत्माराम फडकले, संजय आंब्रे, उस्मान हसन झगडे, गंगाराम धोंडू इप्ते, संजय तुळशीराम मोहिते यांचा समावेश आहे.
मोर्चा कशासाठी होता?
ग्रामस्थांच्या रोजगाराबाबतच्या मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी आणि उपसरपंचांसह काही जणांवर केल्या जात असलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.