ओडिशातला रेल्वे अपघात नेमका कसा झाला, वाचा सविस्तर..

Spread the love

ओडिशा- ओडिशामधून एक मोठी बातमी समोर येतेय.ओडिशा बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ शुक्रवारी रात्री भयंकर मोठा रेल्वेचा अपघात झालाय. हा कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर झाल्यामुळे घडलाय. या अपघातातील मृतांची संख्या २८८ इतकी झाली आहे तर ९०० प्रवासी जखमी झाल्याचं देखील समोर आलंय आहेत.सुरुवातीला मृतांची संख्या ३० असल्याचं समोर आलं होतं, त्यानंतर ही संख्या ५० इतकी झाली. मात्र आता ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार मृतांची संख्या २३८ इतकी झालीये.

ओडिशातील बालासोर येथे काल संध्याकाळी ६ वाजून ५१ मिनिटांनी रेल्वेचा मोठा अपघात झाला आहे. देशातील हा आजवरचा सर्वात मोठा अपघात आहे. बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची एकमेकांना धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की ट्रेनचे अनेक डब्बे मालगाडीवर जाऊन आदळले.यात सात डब्बे पलटी झाले. चार डब्बे रेल्वे बाँड्रीच्या बाहेर गेले. एकूण १५ डब्बे पटरीच्या बाहेर होते. या दुर्देवी आणि भयंकर अपघातातील मृतांची संख्या २३३ वर पोहोचली आहे. तसेच अपघातात आतापर्यंत ९०० प्रवासी जखमी झाले आहेत. कालपासून बालासोर येथे युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे.

अपघाताची माहिती मिळताच एनडीआरएफच्या पथकांनी अपघात स्थळी जाऊन मदत आणि बचाव कार्य सुरु केलंय. बहनागा बाजार स्टेशन परिसरात किंकाळ्या, रडणं, हुंदके, जखमी लोक हे सगळं भयानक चित्र रात्रभर पाहायला मिळत होतं.हा अपघात इतका भयंकर होता की, बोगींच्या मध्ये चिकटेलेले मृतदेह काढण्यासाठी एनडीआरएफला गॅस कटरचा वापर करावा लागला. आता लष्करानेही या मदत आणि बचाव कार्यात भाग घेतला आहे. त्यांच्याकडूनही जखमींना मदत केली जाते आहे. दरम्यान केंद्राकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १२ लाखांची मदत जाहीर करण्यात आलेय.दुसरीकडे शुक्रवारी झालेल्या या भीषण रेल्वे अपघातानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी एक दिवसाचा दुखवटा राज्यात जाहीर केला आहे. ३ जून या दिवशी ओडिशात कुठलाही उत्सव किंवा तसा कार्यक्रम सादर केला जाणार नाही,असं देखील सांगण्यात आलंय.

अपघात कसा झाला?
कोरोमंडल एक्स्प्रेस ट्रेन क्रमांक १२८४१ चे कोच बी २ ते बी ९ हे डबे रुळावरुन घसरले. त्यानंतर बी १ हा कोच आणि इंजिनही रुळावरुन घसरलं. त्यानंतर मालगाडीची टक्कर झाली. जे लोक एसी बोगीमध्ये बसले होते त्या प्रवाशांचा मृत्यू मोठ्या प्रमाणावर झाला आहे असंही रेल्वेच्या प्रेस रिलिजमध्ये म्हटलं गेलंय. हावडा मेलची ही टक्कर या दरम्यान झालीये. त्यामुळे या अपघातीची तीव्रता खूप मोठी आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page