
४ जून रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीची घटना घडून ११ जणांचा मृत्यू झाला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना प्रत्येकी १० लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
बंगळुरू: तब्बल 18 वर्षांनी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने आयपीएलची ट्रॉफी जिंकली. त्यानंतर बंगलोरमध्ये आरसीबीच्या संघाची विजयी रॅली काढण्यात आली होती. या विजयाच्या सोहळ्यात चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. तिथे झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. आता त्यावरून कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन आणि डीएनए इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा विजयी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र स्टेडियमबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. तिथे चेंगराचेंगरी झाली. यात 11 जणांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले. त्यानंतर कर्नाटक हायकोर्टाने सरकारला नोटीस बजावली आहे. तसेच आरसीबी, डीएनए, कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन आणि इतरांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आयरिसीबीचे टेंशन वाढले आहे.
४ जून रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीची घटना घडून ११ जणांचा मृत्यू झाला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना प्रत्येकी १० लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. आरसीबी संघाकडून हे एक कौतुकास्पद पाऊल टाकण्यात आल्याचे मानले जात आहे. १७ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आरसीबीने आयपीएल २०२५ ट्रॉफीवर नाव कोरले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून मृतांना १० लाख देण्याची घोषणा…
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अपघाताबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, पुरेशी सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करणे ही सरकारची जबाबदारी आहे. तसेच ते म्हणाले की, क्रिकेट असोसिएशनने परिस्थिती हाताळायला हवी होती. स्टेडियममध्ये फक्त एक छोटासा गेट उघडा होता, जिथे मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. गर्दी वाढताच लोकांनी जबरदस्तीने दरवाजा तोडला, ज्यामुळे चेंगराचेंगरीची घटना घडली. मुख्यमंत्र्यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची आर्थिक मदतीची घोषणा केली.