धोनीला मागे टाकून रवींद्र जडेजाची मोठी झेप!..

Spread the love

२२ जुलै:भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरी कसोटी खेळली जात आहे. पहिली कसोटी जिंकून टीम इंडियाने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या प्रमाणे दुसऱ्या कसोटीतही भारताच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांनी अर्धशतकी खेळी केली. तर, विराट कोहलीने 500 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात इतिहास रचताना 121 धावा धावा फटकावत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 76 वे शतक झळकावले. या शतकासाठी विराटची सर्वत्र चर्चा सुरू आहे., पण रवींद्र जडेजानेही उत्कृष्ट कामगिरी करत आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे.

दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात भारताने झटपट विकेट्स गमावल्यानंतर विराट कोहलीने रवींद्र जडेजासह संघाचा डाव सांभाळला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 159 धावांची भागीदारी केली. विराटने 121 धावांचे योगदान दिले तर जडेजानेही 152 चेंडूत 61 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यासह त्याने टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीला मागे टाकले आहे. सहाव्या किंवा त्याखालील क्रमांकावर मैदानात उतरून सर्वात चांगल्या सरारीने फलंदाजी करण्याच्या बाबतीत आता जडेजाने थेट दुसरे स्थान पटकावले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page