रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी तळवली तालुका गुहागर येथील सरपंच मयुरी शिगवण पात्र ठरवल्याने सरपंच पदावर राहणार कायम…

Spread the love

रत्नागिरी प्रतिनिधी- रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी तळवली तालुका गुहागर येथील सरपंचांना आपल्या दिलेल्या निकाल मध्ये पात्र ठरवले आहे. त्यामुळे सरपंच मयुरी शिवगण सरपंच पदावर ती कायम राहणार आहेत . अडवोकेट अमित शिरगावकर यांनी सदर केस मध्ये सरपंच यांची बाजू मांडली होती. सरपंच मयुरी यांच्यावर झालेला अन्याय विरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती. तहसीलदार यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे केस दाखल केली होती. सदर केस मध्ये तहसीलदार यांचा  निर्णय जिल्हाधिकारी यांनी चुकीचा ठरवला असून सरपंच मयूर शिगवण यांना पात्र ठरविले सरपंच पदावर कायम राहणार आहेत. यावेळी सरपंच यांनी एडवोकेट अमित शिरगावकर यांच्या आभार मानले आहेत.

गुहागर तहसीलदार यांनी तळवली गुहागर च्या सरपंच मयुरी शिगवण यांना दिनांक   ७/४/२५ रोजी अपात्र ठरवले होते त्या निर्णयाच्या  आदेशविरुद्ध तळवली सरपंच यांनी जिल्हाधिकारी  यांच्याकडे अपील दाखल केले होते. सदर अपिलात तहसीलदार गुहागर यांनी दिलेला निर्णय रद्द करण्यात येऊन तळवली गुहागरच्या सरपंच मयुरी शिगवण यांना पात्र ठरवले. सदर कामी सरपंच मयुरी शिगवण यांचे वतीने एडवोकेट अमित अनंत शिरगावकर यांनी कामकाज पाहिले. सरपंच पदावर मयुरी शिगवण कायम राहिल्याबद्दल त्यांच्या मित्रपरिवार कडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page