तांबेडी गावात पावसाचे थैमान; शेतात पाणी घुसल्याने गाळ साचला; भातशेतीचे नुकसान…

Spread the love

सरपंच श्री. प्रशांत ब्रीद यांनी स्वतः जेसीबी आणून स्वखर्चाने काढला शेतातील साचलेला गाळ

सरपंच प्रशांत ब्रीद याचे होतेय सर्व स्तरावरून कौतुक

*संगमेश्वर-* संगमेश्वर तालुक्यात गेली दोन दिवस पावसाचा चांगलाच जोर वाढला असुन नदी नाल्याना पुराचे स्वरूप आले आहे यश ब्रीद आणि सतिष चाळके आणि इतर शेतकऱ्यांच्या शेतात या पऱ्याचे पाणी घुसल्याने मोठं मोठी झाडे, पाळा पाचोळा माती याचा पुर्ण गाळ त्यांच्या शेतात बसल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.

येथील सरपंच श्री, प्रशांत ब्रीद यांनी स्वतः च्या खर्चाने जेसिबी आणून शेतातील गाळ काढून येथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्या मदतीला गावचे पोलीस पाटील संतोष ब्रीद, राजू ब्रीद, संदीप कदम, शिवराम गोसावी, सागर सावंत आदी ग्रामस्थानी मदत कार्य करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरपंच प्रशांत ब्रीद यांनी स्वतः भर पावसात स्व खर्चानेगाळ काढल्याने सरपंच यांचे परिसरातुन कौतुक होत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page