पनवेल : मुंबई गोवा महामार्गाचे काम दिवसरात्र केले जात असल्याचा राज्य सरकारचा दावा आहे. परंतू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रात्रभर जागून केलेल्या पाहणीत ज्या अत्याधुनिक गतीने केल्या जात असलेल्या महामार्गाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप केला आहे. यामुळे पुन्हा एकदा भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण विरुद्ध मनसे असा संघर्ष समाज माध्यमांवर होताना दिसत आहे. शनिवारी सकाळपासून मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर असा मंत्री रविंद्र चव्हाण यांचा बांधकामाचा पाहणी दौरा पत्रकारांसोबत सूरु झाला. मंत्री चव्हाण हे दौऱ्यातून सरकारी अधिकारी आणि महामार्ग बांधणारे ठेकेदार कंपनी यांच्यावर दबाव ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. गणेशोत्सवापूर्वी एकतरी मार्गिका पुर्ण करु असा दावा मंत्री चव्हाण यांनी केला आहे.
मनसेचे पनवेलचे महानगर अध्यक्ष योगेश चिले यांनी रात्रीत जागून या कामाची पाहणी केल्यावर कामात कुठ्ल्याही सळईचा वापर केला जात नाही, तसेच रस्त्यावर आच्छादन टाकल्यावर त्यावर वाई-ब्रेटर न वापरता कॉंक्रीट पसरविण्याचे काम सूरु असल्याचे फेसबुक माध्यमातून सोशल माध्यमांवर पसरविली आहे. रविवारी मनसे या महामार्गावर जागर पदयात्रा काढणार असल्याने राज्य सरकार जागे झाले असल्याचा मनसेचा दावा आहे. या दरम्यान शनिवारी सकाळी मंत्री चव्हाण यांनी महामार्गाची पाहणी करुन संपुर्ण पाहणीनंतर पत्रकारांना प्रतिक्रीया देऊ असे सांगितले.
जाहिरात