शनिवारपर्यंत E-KYC न केल्यास पीएम किसान योजनेचा लाभ नाही…

Spread the love

जनशक्तीचा दबाव न्यूज | सप्टेंबर ०८, २०२३.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण, बँक खाते आधार सलग्न करणे व भुमिअभिलेख नोंदी अदयावत करणे या बाबी केंद्र शासनाने अनिवार्य केल्या आहेत.

शासनाच्या सुचनेनुसार जे लाभार्थी येत्या शनिवार पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण करनार नाहीत तसेच बँक खाते आधार संलग्न करणार नाही त्यांची नावे पीएम किसान योजनेतुन वगळण्यात येणार आहेत.

लाभार्थी शेतकऱ्यांना वारंवार आवाहन करूनही केवायसी अपडेट होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. दि.9 सप्टेंबर ही केवायसी व आधार अपडेट करण्याची शेवटची मुदत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page