
दापोली :निलिमा चव्हाण हिचा घातपातच झाला असल्याचा दाट संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केला असून या संदर्भात पोलिसांनी कसून चौकशी करावी.निलिमाच्या मारेकरांचा १२ ऑ.२३ पर्यंत शोध पोलिसांकडून घेतला गेला नाही,तर कोणत्याही प्रकारची पूर्वसुचना न देता रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नाभिक समाज बांधव हे १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनापासून उपोषणाला बसतील आणि मग त्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला,तर पोलीस प्रशासनच त्याला जबाबदार राहील,असा थेट इशाराच दापोली पोलीस ठाण्यात निवेदन देत जिल्ह्यातील नाभिक समाज बांधवांनी दिला आहे.दापोली येथून चिपळूण ओमळी येथील आपल्या घरी जायला निघालेली निलिमा सुधाकर चव्हाण ही तिच्या घरी पोहोचली नव्हती.यासाठी तिच्या नातेवाईकांनी निलिमा बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली होती.त्यानुसार दापोली पोलिसांचा शोध सुरूअसतानाच तिचा मृतदेह दापोली तालुक्यातील दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उसगाव येथील जे.एस.डब्ल्यू जेटीच्या खाडीच्या पाण्यात सापडल्याने खळबळ उडाली होती
जाहिरात
