
रत्नागिरी गेल्या काही दिवसांपासून पोलिस विभागाकडून जिल्हाभरात वेगवेगळ्या ठिकाणी अंमली पदार्थ विरोधी धडक कारवाई करण्यात आली आहे.
आता पर्यत जिल्हाभरात एन.डी.पी.एस कायद्यांतर्गत एकूण 20 केसेस करण्यात आल्या आहेत .या कारवायांमुळे अंमली पदार्थ विक्रीला चाप बसला असून आगामी कालावधीत जिल्ह्यातून अंमली पदार्थ विक्री व्यवसाय समुळ नष्ट होण्यास मदत होणार असल्याची माहिती पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कारवायांमध्ये एकूण 36 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून त्यांना या गुन्ह्यात मदत करणार्यांबाबतचा डेटा जमा करण्यात येत आहे.
या गुन्ह्यांमधील आरोपी हे गांजा हा अंमली पदार्थ पंढरपूर,मिरज,सातारा,पूणे,मुंबईतून आणि असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे.या अटक करण्यात आलेल्या एकूण आरोपींपैकी 22 आरोपींवर प्रतिबंधात्मक आरवाई करण्यात आली आहे.त्यामध्ये सी.आर.पी.सी 107 प्रमाणे 6 जणांवर,सी.आर.पी.सी 110 प्रमाणे 10 जणांवर तर अन्य 6 जणांवर मु.पो.कायदा कलम 56 प्रमाणे तडीपरीची कारवाई करण्यात आली असून त्याबाबत प्रांतांकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेले असून त्यांची चौकशी सुरु आहे.दरम्यान यावेळी बोलताना पोलिस अधिकक्षक धनंजय कुलकर्णी शहरातील शिवाजीनगर येथील वेश्या व्यवसाय प्रकरणात आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आल्याचे सांगितले.त्यांच्याकडून अशाचप्रकारे शहरात अन्य दोन ते तिन ठिकाणी हा व्यवसाय चालवण्यात येत होता.रत्नागिरी हे सांस्कृतिक ठिकाण असून या ठिकाणी अशाप्रकारे चालवण्यात येणार्या व्यवसायांवर या पुढेही कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.