मराठी माणसाची इच्छा असली तरी समोरच्याची पण इच्छा असली पाहिजे ; मनसे आमदार राजू

Spread the love

ठाणे ; गुरुवारी (६ जुलै) मनसेचे नेते आणि राज ठाकरेंचे विश्वासू अभिजीत पानसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. त्यामुळे पानसे हे युतीचा प्रस्ताव घेऊन संजय राऊतांकडे गेले होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर आता मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अभिजीत पानसे आणि संजय राऊतांच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना राजू पाटील म्हणाले, “मनसे नेते अभिजीत पानसे आणि संजय राऊत यांचे पहिल्यापासून चांगले संबंध आहेत. पानसे यांनी अलीकडेच ‘ठाकरे’ चित्रपट काढला होता. मला वाटतंय, आता नवीन एखादी स्क्रीप्ट आली असेल त्यामुळे ते संजय राऊतांशी चर्चा करण्यासाठी गेले असावेत.”
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युती होईल का? असं विचारलं असता राजू पाटील पुढे म्हणाले, “मला नाही वाटतं की युती होईल. कारण ही युती व्हावी, अशी मराठी माणसाची इच्छा असली तरी समोरच्याची पण इच्छा असली पाहिजे. समोरच्याला युती व्हावी यापेक्षा भीती जास्त वाटत आहे. त्यांच्याशी युती करायची माझी अजिबात इच्छा नाही. फक्त ते अडचणीत आहेत म्हणून आम्ही युती का करावी?”
आमचे नेते राजसाहेब अडचणीत असताना आणि त्यांच्या घरी कौटुंबीक प्रसंग घडला असताना तुम्ही (ठाकरे गट) आमचे नरसेवक फोडले. आता तुमच्यावर वेळ आली म्हणून आम्ही युती करायची का? आम्ही आतापर्यंत कुणाशीही युती केली नाही. यापुढेही करू नये, असं माझं वैयक्तिक मत आहे. माझं हे मत मनसैनिक म्हणून आहे, मनसेचा नेता म्हणून नाही,” असंही राजू पाटील म्हणाले. ते ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page