
संगमेश्वर प्रतिनिधी- कोंड असुर्डे पंचक्रोशी मध्ये वारंवार लाईट जाते. सदरच्या तक्रारी वारंवार करण्यात आलेले आहेत. मुंबई गोवा हायवे च्या कामामुळे वारंवार लाईट घालवण्यात येते. गेली चार ते पाच वर्ष हा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे परत एकदा त्याचा फटका कोंड असुर्डे पंचक्रोशीची नागरिकांना बसला आहे. मागील पंधरा दिवसांमध्ये ही दुसरी वेळ आहे. लोकांना अंधारामध्ये रात्र काढावी लागली आहे.
कसबा येथील फिटर वरून कोंड असुर्डे ,मौजे असुर्डे गावी वगळून संगमेश्वर ला जोडणे ची मागणी…
गेल्या अनेक वर्ष नागरिकांची मागणी आहे की कसबा लाईन वरून कोंड असुर्डे व पंचक्रोशीला करण्यात येणाऱ्या सप्लाय संगमेश्वर बाजारपेठ लाईनला जोडण्यात यावा अशी मागणी केली चार ते पाच वर्षे होते परंतु सदर मागणीला महावितरण करून कोणताही उपाययोजना करण्यात आल्या नाही. त्यामुळे वारंवार लाईट जात असल्याने त्याचा फटका येथील नागरिकांना बसत आहे. या संदर्भातील तक्रारी देऊ नये कोणतेही दखल महावितरणाने घेतलेली नाही. त्यामुळे त्वरित उपाययोजना करून संगमेश्वर बाजारपेठ येथील लाईन वरून कोंड असुर्डे पंचक्रोशीतील लाईन जोडावी अशी नागरिकांची मागणी आहे.
जुने वडाचे झाड धोकादायक असतानाही हायवे प्रशासनाने केले दुर्लक्ष…
मुंबई गोवा हायवे लगत पारेख पंप येथे जुनी वडाची झाडे आहेत. सदर झाडे धोकादायक असून महामार्ग प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने जर चे झाड पडले आहे. महामार्ग प्रशासन वारंवार मागणी करूनही सदर झाड तोडण्यास दुर्लक्ष केले आहे सदरची घटना घडवून पाच ते सहा गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. याला जबाबदार कोण असे नागरिकांनी विचारणा केली आहे. महामार्गाची माती काढत असताना पावसाचा अंदाज प्रशासनाने देऊ नये पाणी जाण्यासाठी नाल्यांची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे सदरची घटना घडली असल्याचे म्हटले जाते.
बुधवारी वडाचे झाड वीज पुरवठा खंडित..
बुधवार दिनांक 21 मे 2025 रोजी संध्याकाळी सहाच्या दरम्यान संगमेश्वर येथील पारेख पेट्रोल पंपा जवळ मुंबई गोवा हायवे वरती कामात माती उकरल्याने वडाचे झाड कोसळून कसबा उच्चदाब वाहिनीचे सहा पोल वाकलेले आहेत. कसबा गाव हे इतर ठिकाणहून लाईट घेऊन सुरू करण्यात आलेला आहे. परंतु इतर कोणतीही व्यवस्था नसल्याने पारेख पेट्रोल पंपा जवळील भाग, मापारी मोहल्ला, कोंड असुर्डे, मौजे असुर्डे या ठिकाणचा भाग बंद राहिला आहे. सदरचे काम सकाळी सुरू होऊन दुपारी पर्यंत संपण्याची अपेक्षा आहे. तसेच संगमेश्वर ITI जवळील पोल माती वाहून गेल्याने पडण्याच्या स्थितीत झाला आहे त्यामुळे आयटीआय परिसरातील विद्युत पुरवठा बंद आहे. वरील सर्व कामे उद्या तातडीने पूर्ण करून विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे. परंतु वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे गेली दोन ते तीन वर्ष नागरिक त्रास सहन करत आहेत.