रत्नागिरी तालुक्यातील अवैध चिराखाणी व्यावसायिकांवर तसेच शासकीय नियमानुसार काम न करणार्‍या खाणमालकांवर कायदेशीर कारवाई करा : रत्नागिरी मनसेची प्रशासनाकडे मागणी

Spread the love

रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील अनेक ठिकाणी विशेषतः देवूड, मासेबाव, चवे, नरबे, करबुडे, भोके, चाफे इ. ठिकाणी शासकीय नियम धाब्यावर बसवून चिराखाण व्यवसाय करण्यात येत असून काही ठिकाणी विना परवाना हा व्यवसाय करण्यात येत आहे. काही चिराखाणींच्या ठिकाणी सुरक्षिततेचा अभाव तसेच शौचालयाची व्यवस्थादेखील नाही. तसेच रहदारीच्या मुख्य रस्त्यापासून २०० मीटर कक्षेत देखील चिराखाणी चालू करण्यात आल्या आहेत..या खाणी खोदण्याचे भूगर्भीय मर्यादेचे देखील उल्लंघन होत असून अशा खोलवर खाणींमध्ये पाळीव जनावरे तसेच मनुष्यहानी सुद्धा झालेली आहे या सर्व गोष्टींवर जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करण्यात यावी यासंदर्भातील निवेदन आज मनसे तालुकाध्यक्ष श्री.रूपेश जाधव यांच्या नेतृत्वात मनसेत शिष्टमंडळाने रत्नागिरी तहसीलदार मा.श्री. राजाराम म्हात्रे यांना दिले.

यावेळी तहसिलदार मा. श्री. राजाराम म्हात्रे यांना निवेदन देताना मनसे रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री.रूपेश जाधव, तालुका उपाध्यक्ष श्री. राजू पाचकुडे, श्री. विशाल चव्हाण, श्री. सौरभ पाटील, विभाग अध्यक्ष श्री. अखिल शाहू, श्री. जयेश फणसेकर, श्री. सोम पिलणकर, श्री. नवनाथ साळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page