
दै.अग्रलेखच्या चौथ्या वर्धापनदिनी कर्तृत्ववान व्यक्तीमत्वांचा सन्मान, पत्रकार, कलावंतांच्या पाठीवर शाबासकीची थाप…
*उत्कर्ष गुडेकर/मुंबई-* ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरु झालेल्या आणि अल्पावधीतच ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिक जिल्ह्यात पोहोचलेल्या दै. अग्रलेखचा चौथा वर्धापनदिन रविवारी (दि.१५) कल्याणमधील के.सी. गांधी ऑडिटोरियममध्ये मोठ्या जल्लोषात साजरा झाला. विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजवणाऱ्या मान्यवरांना ‘दै. अग्रलेख सन्मान २०२५’ हा मानाचा पुरस्कार देवून व पत्रकार, नाट्य कलावंतांना सन्मानित करुन दैनिक अग्रलेखने चौथ्या वर्धापनदिनी अनोखा पायंडा पाडला.
मुंबईत नामांकित पत्रकारांच्या मुशीत तयार झालेल्या उमेश मारुती भेरे यांनी चार वर्षांपूर्वी शहापुरमध्ये दै. अग्रलेख हे दैनिक वृत्तपत्र सुरु केले. अभ्यासपूर्ण व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या दखलपात्र बातम्या, अग्रलेख, विविध विषयांचा वेध घेणारी सदरे, वात्रटिका यांमुळे अल्पावधीतच लोकप्रिय बनलेल्या दैनिक अग्रलेखने ४ वर्षांचा यशस्वी पल्ला गाठला.
या चौथ्या वर्धापनदिन कार्यक्रम जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात रुग्णसेवक अजित जाधव, मुंबई म्युनिसिपल को. ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक भानुदास भोईर,अभिनेते सुभाष शिंदे,पत्रकार सुबोध रणशेवरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. तरुलता धानके, समाजसेविका डॉ. पद्मिनी कृष्णा, साहित्यिक संतोष जाधव, लेखक, अभिनेता दिपक खांडेकर यांना मान्यवरांच्या हस्ते ‘दै. अग्रलेख सन्मान २०२५’ हा मानाचा पुरस्कार देवून गौरवण्यात आले. दैनिक अग्रलेखच्या वाटचालीत मोलाचे योगदान देणाऱ्या पत्रकारांचा आदर्श पत्रकार पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.या पुरस्कार वितरण समारंभात कोकणचे सुपुत्र समाजसेवक आरटीआय कार्यकर्ता केतन भोज, शांताराम गुडेकर, दिपक कारकर, निलेश कोकमकर यांना “आदर्श पत्रकार पुरस्कार -२०२५ ” देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामधील कोचरी गावातील सुपुत्र कु. केतन भोज यांचा हा सातवा पुरस्कार असून ते आरटीआय कार्यकर्ता आहेत. शिवाय कोकणच्या समस्यांवर लेखन करून त्यांचा पाठपुरावा सातत्याने ते करत आहेत.
महाराष्ट्र हरित सेना,वन विभाग महाराष्ट्र शासनचे ते सदस्य आहेत.कोकणातील अनेक समस्या वर्तमान पत्रात मांडून त्यांना मार्गी लावण्यात केतन भोज अग्रेसर आहेत. त्यांना मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य यांच्या सहीचे सोशल मिडिया महामित्र हे सन्मानपत्रही प्राप्त झालेले आहे. शिवाय ते विविध संस्था,पत्रकार संघटना, वृत्तपत्र लेखक संघ,मंडळ यांचे पदाधिकारी असून हातात घेतलेलं प्रत्येक काम पूर्ण करण्यात ते यशस्वी झालेले आहेत.आजवर अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या सह्याद्रीचा प्रतिकैलास श्रीक्षेत्र मार्लेश्वर परिसरातील आंगवली -रेवाळेवाडीचे सुपुत्र विक्रोळी पश्चिम पार्क साईट येथील रहिवासी दै. अग्रलेखचे मुंबई/कोकण विभागीय संपादक, वृत्तपत्रलेखक शांत्ताराम लक्ष्मण गुडेकर ( Ex.S.E.O)यांची जॉय सामाजिक संस्था मुंबई(रजि.) तर्फे “आदर्श पत्रकार पुरस्कार -२०२५ प्राप्त झाला असून त्यांना दै. अग्रलेख तर्फे”आदर्श पत्रकार पुरस्कार-२०२५ प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले.
शांत्ताराम गुडेकर यांना महाराष्ट्र शासनाने “विशेष कार्यकारी अधिकारी” म्हणून २०१२ ते २०१७ या कालावधीसाठी नियुक्त केले होते.त्यांना डाँ.बाबासाहेब आंबेडकर फँलोशिप पुरस्कार -दिल्ली प्राप्त झालेला आहे.ते महाराष्ट्र शासनाच्या नागरी संरक्षण दल-एन विभाग-क्षेत्र-३ मध्ये स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते.शिवाय महाराष्ट्र शासन अनुदानित नशाबंदी मंडळ- महाराष्ट्र राज्य या मंडळतर्फे नशाबंदी चे काम करतात.
कोकण विभाग पत्रकार संघ मुंबई जिल्हा सचिव म्हणून ते काम पाहिले असून त्यांना नगर मित्र,आदर्श समाजसेवक समाजरत्न दक्ष नागरिक ,कोकण भूषण ,वृत्तदिप पुरस्कार ,महापौर गौरवपत्र तसेच सोनी टि.व्ही वरील सी.आय.डी मालीकेला वर्धापनदिनानिमि आयोजित कार्यक्रमात शांत्ताराम गुडेकर यांना “स्थानिक हिरो” सी.आय.डी मेडल व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आलेले आहे.शांताराम गुडेकर महाराष्ट्र हरित सेना, वन विभाग, महाराष्ट्र शासन चे सदस्य, माझी वसुंधरा, महाराष्ट्र शासन चे सदस्य आहेत. शिवाय माहिती अधिकार, पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण सेना चे मुंबई जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आहेत.अखिल भारतीय पत्रकार हक्क संसद समिती चे मुंबई उपनगर सचिव आहेत.
पत्रकार दिपक कारकर उत्तम सूत्रसंचालक असून कोकणातील शक्ती-तुरा, नमन, नाटक आदी लोककलेना मुंबई रंग मंचावर व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात अग्रेसर आहेत. ते श्री पानबुडी देवी कलामंच आणि सहकारी यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित करत असतात.कोकणातील सर्व क्षेत्रातील दुर्लक्षित असलेल्या कलाकारांना पुढे आणण्यात दिपक कारकर पुढे असतात. पत्रकार म्हणून कोकण विभागातील अनेक समस्या, जनजागृती करणारे लेखन ते सतत करत असतात. ते एक उत्तम कलाकार ही आहेत. सर्वाना सोबत घेऊन काम करणे ते जास्त पसंद करतात. आजवर अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले असून ते विविध मंडळ, ग्राम, मुंबई विभागातील संस्था, समाज मंडळ वर पदाधिकारी म्हणून उत्तम काम करत आहेत.
.
निलेश कोकमकर पत्रकार असून रक्तदानचे महत्व पटवत स्वतः रक्तदान करतात.शिवाय जनजागृती करत रक्तदान विषयी प्रचार आणि प्रसार करत आहेत. रक्तदान हे महानदान मानले जातेच त्याच मूळ कारण आपलं रक्तदान म्हणजेच इतरांना जीवनदान,कधी कधी जिथं रक्ताची नाती सुद्धा तयार होत नाहीत तिथं अनेक रक्तदाते एखाद्याला जीवनदान देण्याकरता तत्पर असतात हे म्हणावं लागेल.वर्षभर अनेक ब्लड कॅम्प तसेच नवनवीन रक्तदात्यांना प्रेरित करुन रक्तदान करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल विविध संस्था, मंडळ, ब्लड बँक तर्फे निलेश कोकमकर यांना सन्मानित केले आहे.ते विविध मंडळ, ग्राम, समाज मंडळ, युवा मंडळ मध्ये कार्यरत असून त्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहेत.
ग्रामीण कला मंच या नाट्यक्षेत्रातील नामवंत संस्थेच्या व्यासपीठावर विविध नाटके सादर करणाऱ्या कलावंतांना सन्मानपत्र देवून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचा स्तुत्य उपक्रम याप्रसंगी संपादक उमेश भेरे व कार्यकारी संपादक मैथिली भेरे यांनी राबवला. दैनिक अग्रलेखने शहापुरमधील सामाजिक प्रश्नांवर लोकजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या खुल्या निबंध स्पर्धेचा पारितोषिक प्रदान सोहळाही यावेळी संपन्न झाला. उपस्थित मान्यवरांनी संपादक उमेश भेरे यांच्या व दै. अग्रलेखच्या यशस्वी वाटचालीबद्दल अभिनंदन करत भेरे यांच्या अग्रलेखांचे व वात्रटिकांचे विशेष कौतुक केले.
याप्रसंगी उत्तर भारतीय एज्युकेशन ऍण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. विजय पंडित, निर्माता-दिग्दर्शक राकेश राऊत, ह. भ. प. कैलास महाराज निचिते, कोकण कुणबी महोत्सव समितीचे अध्यक्ष रविंद्र चंदे, शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विनायक सापळे, क्रूगर व्हेंटीलेशनचे जनरल मॅनेजर संपत शेंडगे, उद्योजक अशोक सांगळे, पालघर जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समिती सभापती संदेश ढोणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
केतन भोज, शांताराम गुडेकर, दिपक कारकर, निलेश कोकमकर यांना “आदर्श पत्रकार पुरस्कार -२०२५ प्राप्त झाल्याबद्दल अनेकांनी अभिनंदनासह शुभेच्छा दिल्या आहेत.
या सोहळ्याचे प्रास्ताविक संपादक उमेश भेरे यांनी तर सूत्रसंचालन नितीन गाडेकर व संतोष दवणे यांनी केले.