
कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण युद्धपातळीवर सुरु असतानाच, अंबा घाटाच्या सुधारणा आणि रुंदीकरणाचे प्रयत्न सुरु आहेत.
*रत्नागिरी :* कोकण ते पश्चिम महाराष्ट्र होणारा अंबा घाटातील प्रवास आता अधिक सोयीस्कर आणि जलद होणार आहे. कारण या घाटातील डोंगरातून साडेतीन किलोमीटरचा बोगदा काढण्यास मंजुरी मिळाली आहे. रत्नागिरी-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक वळणं आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवास अत्यंत सुरक्षित आणि जलद होणार आहे. यासाठी सध्या एका खासगी एजन्सीकडून या प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे.
एकीकडे, कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण युद्धपातळीवर सुरु असतानाच, अंबा घाटाच्या सुधारणा आणि रुंदीकरणाच्या दृष्टीने हे सर्वेक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. हा घाट हा साधारण सात किलोमीटर लांबीचा आहे. पावसाळ्यात अनेक वेळा दरड कोसळण्याचे प्रकारही या घाटात घडतात.
या पार्श्वभूमीवर, घाटातील धोकादायक भाग कायमस्वरुपी वगळण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. सर्वेक्षणानंतर बोगद्याची लांबी, रुंदी आणि तांत्रिकदृष्ट्या आराखडा तयार करण्यात येईल. या आराखड्यानंतर अंदाजपत्रक तयार करून त्याला मंजुरी मिळाल्यावर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्या जातील. त्यानंतरच प्रत्यक्ष काम सुरु होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
पर्यावरणाचा समतोल राखून घाटातील वन्य प्राणी, राष्ट्रीय उद्यान आणि जंगल परिसराचा विचार करून हा प्रकल्प अहवाल येणार निश्चित करण्यात येणार असून त्यानुसारच याला अंतिम स्वरुप देण्यात येणार आहे.
कल्याण-शिळ रस्त्यावरील कोंडीचे ग्रहण कायम…
दुसरीकडे कल्याण-शिळ मार्गावर सुरू असलेली मेट्रोची कामं, रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे मार्गावरील वाहतूक कोंडीचं ग्रहण कायम आहे. वाहन चालक या कोंडीत तास न् तास अडकत असल्याने इंधन आणि वेळेचा अपव्यय होत आहेच. शिवाय त्यांना प्रचंड मानसिक त्रासालाही सामोरं जावं लागत आहे. परिणामी, वाहन चालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
कल्याण-शिळ या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून रस्ता रुंदीकरणासह काँक्रीटीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. परंतु ही कोंडी फुटण्याची चिन्हं अद्याप दिसत नाहीत. या रस्त्यावर अनेक ठिकाणी सिमेंट उखडल्याचं सांगितलं जात आहे. या मार्गावर मेट्रोचे काम सुरू असल्याने पिलर उभारण्यासाठी निम्म्याहून अधिक रस्ता बॅरिकेडने बंद करावा लागत आहे. परिणामी अरुंद रस्त्यातून बाहेर पडताना वाहन चालकाची मोठी दमछाक होत आहे.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…

