छत्तीसगडमध्ये २६ नक्षलवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलाची मोठी कारवाई; एक जवानही शहीद…

Spread the love

रायपूर- छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलांनी २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. तर या कारवाईत एक जवान शहीद झाला असल्याचे सांगितलं जात आहे. अबुझमद परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, या कारवाई बाबत अधिक माहिती देतांना नारायणपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक प्रभात कुमार म्हणाले की, जिल्ह्यातील अबुझमद भागातील माड विभागात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीच्या आधारे, जिल्हा राखीव रक्षक नारायणपूर, DRG दंतेवाडा, DRG विजापूर आणि DRG कोंडागाव यांचे संयुक्त पथकाने  ही कारवाई करत नक्षलवाद्यांच्या तळावर मोठी कारवाई सुरू केली आहे. सध्या या परिसरात अद्यापही सर्च ऑपरेशन सुरू आहे. किंबहुना  नक्षलवाद्यांच्या मृत्यूचा आकडा वाढण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. या कारवाईत माओवाद्यांच्या माड विभागाच्या एका मोठ्या केडरची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे डीआरजी नारायणपूर, दंतेवाडा, विजापूर आणि कोंडागाव यांनी अबुझहमदमध्ये ऑपरेशन राबवलं. दरम्यान, सकाळपासून नक्षलवादी आणि डीआरजी संयुक्त दलांमध्ये चकमक सुरू आहे. अशातच नक्षलवादी संघटनेचा जनरल सेक्रेटरी बसव राजूही यात मारला गेल्याची माहिती समोर आली आहे. बसव राजू या माओवाद्यांवर तब्बल एक कोटीचे बक्षीस होतं. तसेच त्याने अनेक घातपाताच्या कारवायांमध्येही सक्रिय होता. अबूझमाडच्या जंगलात छत्तीसगडच्या डीआरजी आणि जवानांमध्ये अद्याप चकमक सुरू आहे. मात्र  या नक्षलविरोधी अभियानाला आता मोठे यश येत असल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे मृतक नक्षलवाद्यांची संख्या वाढण्याचीही  शक्यता आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page