दाभोळे व कनकाडी परिसरात भीषण वणवा; ६०० काजू कलमे जळून खाक…

Spread the love

संगमेश्वर :- तालुक्यातील दाभोळे व कनकाडी परिसरात शुक्रवारी दुपारी लागलेल्या वणव्याने बागायतदारांची ६०० काजू कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
    

दहा बागायतदारांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. आग लागल्याची बातमी कळताच विलास सोना सुकम, सोना सखाराम सुकम, रमेश लक्ष्मण जाधव, भीमराज चंद्रकांत जाधव, अनंत लक्ष्मण जाधव, प्रदीप सखाराम जाधव, प्रकाश गोविंद जाधव, संदीप जयराम जाधव, प्रकाश कृष्णा गराटे आणि बाबू लक्ष्मण जाधव हे बागायतदार घटनास्थळी धावले. हातात पाणी, फांद्या, माती ज्या मिळतील त्या साधनांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा त्यांनी शर्थीचा प्रयत्न केला. मात्र वाऱ्याचा जोर आणि सुकलेले गवत यामुळे आग
पसरली आणि बाग वाचवणे अशक्य ठरले.
      

काही मिनिटांतच आगीने काजू बाग अक्षरशः जळून गेल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामे सुरू केले. कृषी अधिकारी चौगुले, तलाठी डोंगरे, पोलीस पाटील सौ. खांदारे, तसेच माजी उपसरपंच हेमंत शिंदे यांनी प्रत्यक्ष बागेत जाऊन पाहणी केली. उत्पन्नाच्या उंबरठ्यावर असलेली, वीस वर्षांची झाडे कोळशात रूपांतरित झाल्याचे दृश्य पाहून अधिकाऱ्यांनीही हळहळ व्यक्त केली. वीस वर्षे आम्ही या झाडांना पाणी घालून, जीव ओतून वाढवले. आज त्याची राख झाली. केवळ पंचनामे नकोत त्वरित आणि योग्य नुकसानभरपाई मिळाली, तरच आम्ही उभे राहू, अशी मागणी बागायतदारांनी केली आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page