अमरावती : अंबादास दानवे हे अमरावती दौऱ्यावर आहेत. त्यावेळी भाषणादरम्यान त्यांनी सुरुवातीलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. मला डायसची गरज नाही, मला वाचून भाषण देण्याची सवय नाही म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. तर नुकतीच दोन्ही गटाला नावं आणि चिन्ह मिळाली असल्याने ठाकरे गटाच्या मशालीचा इतिहास सांगत शिंदे गटाला लक्ष केले आहे. त्यात दानवेंनी म्हंटलं, गद्दारीची तलवार घेऊन तुम्ही आमच्या जवळ येण्याचा प्रयत्न जरी केला तरि ही मशाल तुम्हाला भस्मसात करेल. गावागावात आपल्याला मशाली काढाव्या लागतील मशाल ही आता जनते समोर पोहचली पाहिजे. याशिवाय बरेच जण आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची भाषा करतात, आमचं हिंदुत्व कागदावरच नाही असे सांगत सांगलीत साधूवर हल्ला झाला तेव्हा तुम्ही काय केलं ? तेव्हा हल्ला झाला तर हिंदू संकटात आला नाही का ? असा सवालही त्यांनी केला
याशिवाय अमरावतीत असल्याने दानवे यांनी राणा दाम्पत्याला लक्ष केले आहे. त्यात त्यांनी आता कुठं गेली हनुमान चालीसा, कुठं गेला भोंगा…असे म्हणत राणा दाम्पत्याला लक्ष केले आहे.