
नृसिंहवाडी : सांगली ,सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात थोडी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने व काही प्रमाणात धरणातून होणारे विसर्ग यामुळे श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या २४ तासात तीन फुटाने वाढ झाली आहे.
दरम्यान कृष्णा नदीचे वाढलेले पाणी येथील प्रसिद्ध अशा दत्त मंदिरासमोर आज पहाटे पोहोचले आहे. सरासरी जुलै महिन्याच्या सुरुवातीला येथील दत्त मंदिरात पाणी येत असते. यावर्षी पावसाने लवकर हजेरी लावल्याने जून महिन्याच्या निम्म्यातच येथील दत्त मंदिराजवळ पाणी पोहोचले आहे.
येथील दत्त देवस्थान मार्फत मंदिर परिसरातील साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.