मध्य रेल्वेच्या निष्काळजी पणामुळे दिव्यातील रेल रोको आंदोलकांवर गुन्हा?; दिवा रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक:-अध्यक्ष.आदेश भगत

Spread the love

संपादकीय: दिवा सीएसएमटी ट्रेन सोडवी व सकाळी गर्दीच्या वेळेस सर्वच जलद गाड्यांना दिवा स्थानकात थांबा मिळावा अशा प्रमुख मागण्यांकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे दिवा स्थानकात प्रवासी आणि रेल्वे प्रशासन यांच्यामध्ये नेहमीच खटके उडत असतात. त्याचाच प्रत्येय बुधवारी सकाळी पुन्हा एकदा दिवा स्थाकात झाला.

दोष कुणाचा…..पहा सविस्तर काय म्हणाले रेल्वे प्रवासी

बुधवारी सकाळी खोपोली वरून सुटणारी जलद लोकल आज दिवा स्थानकात तब्बल २८ मिनिटे उशिराने आली याशिवाय ऐनवेळी या लोकलचा प्लॅटफॉर्म बदलल्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. अशातच काही महिलांनी बाजूला असणाऱ्या मोटरमन केबिन मधील मोटरमनला विनंती केली की, सर्व महिलांना आत मध्ये व्यवस्थित चढू द्यावं आणि त्यानंतरच ट्रेन सुरू करावी परंतु मोटरमनने लोकल सुरू केली आणि मोटरमन केबिनच्या बाजूलाच असलेली एक महिला त्या मोटरमन केबिनमध्ये चढली. ट्रेन सुरू झाल्यानंतर अवघ्या पाच ते दहा मीटर वर ट्रेन पुन्हा थांबवण्यात आली सदर महिलेला मोटारमनच्या केबिन मधून उतरवण्यास सांगितले असता तिने पहिल्यांदा नकार दिला व दहा मिनिटं ट्रेन थांबल्यानंतर सदर महिलेला उतरून बाजूलाच असलेल्या लेडीज डब्यामध्ये बसवण्यात आले आणि त्यानंतर या घटनेची सर्वत्र चर्चा झाल्यानंतर सदर महिला व अन्य चार महिलांना कुर्ला स्थानकातून पकडून दिवा रेल्वे सुरक्षा बलाच्या चौकीत आणण्यात आले व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

दिवा स्थानकातुन मुंबई, कर्जत-कसारा, पनवेल, वसई आणि कोकणच्या दिशेने ट्रेन सुटत असल्यामुळे दिवा स्थाकात प्रवासी संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. सकाळी गर्दीच्या वेळेस दिवा स्थानकातून प्रवास करने खूप कठीण झालं आहे. दिवा स्थानकातून सकाळी गर्दीच्या वेळेस सीएसएमटी साठी गाडी सोडावी ही मागणी गेली अनेक वर्ष येथील प्रवासी व प्रवासी संघटना रेल्वे प्रशासनाकडे करत आहेत. पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गीकीचं काम पूर्ण झाल्यानंतर दिवा सीएसटी लोकल सोडण्यात येईल असेही प्रशासनातर्फे अनेक वेळा सांगण्यात आलं होतं, परंतु पाचव्या व सहाव्या मार्गीकीचं काम पूर्ण होऊन सुद्धा दिवा-सीएसटी लोकलसाठी कोणतेही प्रयत्न रेल्वे प्रशासन करताना दिसत नसल्यामुळे दिवेकर रेल्वे प्रवाशांच्या भावना तीव्र होत चालल्या आहेत.
रेल्वे प्रशासनाने ही बाब गांभीर्याने न घेतल्यास दिवा स्थानकात प्रवाशांच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो.

• अँड.आदेश भगत
अध्यक्ष, दिवा रेल्वे प्रवासी संघटना

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page