

मकरंद सुर्वे संगमेश्वर- काल रात्री पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आणि पहाटेपासून अतिवृष्टीमुळे धामणी ,गोळवली, शास्त्री पूल, आंबेड, नावडी, रामपेठ येथे पावसाने हाहाकार उडवला आहे. धामणी येथे श्रद्धा लॉज बहुउद्देशीय ग्रामपंचायत येथे पाणी घुसल्याने मोठे तारांबळ उडाली तसेच गोळवली अनकरवाडी गावात मोठ्या प्रमाणात भूत खलन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण बसलेले आहे तसेच धामणी स्टॉप हायवे मुंबई गोवा हायवे इथे पण हायवेवर पाणी पाण्याची साठले आणखी जोरदार पाऊस पडला हायवेवर हायवे पाणी येण्याची शक्यता अशी शक्यता व्यक्त करण्यात येते.

सध्या पाऊस स्थिर असून पाणी पातळी स्थिर आहे. पोलीस प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी गाडीने अलौंसिंग करून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
राजवाडी येथील गरम पाण्याच्या कुंडा मध्ये पाणी भरलेले असून अर्धी इमारत पाण्याखाली गेली आहे. कदाचित ही पहिलीच घटना असेल. मुसळधार पावसामुळे शास्त्री नदीच्या लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
धामणी येथील श्रद्धा हॉटेलमध्ये भरले पाणी
मुंबई गोवा हायवे भरती श्रद्धा हॉटेल व ग्रामपंचायत सह इतर इमारतीमध्ये सध्या पाणी भरलेलं असून हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे