सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश ब्रीद यांच्या सिद्धेश ब्रीद युवा प्रतिष्ठान तर्फे शेतकऱ्यांना मोफत खतांचे वाटप…

Spread the love

कडवई /दीपक तुळसणकर- सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश ब्रीद यांच्या सिद्धेश ब्रीद युवा प्रतिष्ठान मार्फत दरवर्षाप्रमाणे शेतकऱ्यांना खताचे वाटप करण्यात आले. यावेळी कडवई पंचक्रोशी आणि कडवई जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांना एक हजार शेतकऱ्यांना मोफत खतांच्या पिशव्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सिद्धेश ब्रीद यांनी सदरचा उपक्रम कोणताही राजकीय याच्यातून नसून संगमेश्वर तालुक्यामध्ये खताचा तुटवडा असून शेतकऱ्यांचे होणारे खतासाठीची परवड दरवर्षी दिसून येते. म्हणून खताचे वाटप करत असल्याचे त्यांनी सांगितले. मी आजपर्यंत फक्त सामाजिक उपक्रम म्हणून लोकांना मदत करण्यासाठी सदरचे कार्यक्रम करतो कोणताही राजकीय हेतू नसल्याचे त्यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये सदरच्या खताचे वाटप करण्यात आले. यावेळी पालकमंत्री यांनी सिद्धेश ब्रीद यांचे पालकमंत्री उदय सामंत यांनी कौतुक केले. सदर कार्यक्रमाला जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष रोहन बने, माजी सभापती दिलीप सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र महाडिक, युवा उद्योजक केतन पवार भाजपा तालुकाध्यक्ष विनोद मस्के तालुका सरचिटणीस अमित ठाकरे पांडुरंग कांबळे माजी सभापती कृष्णा हरेकर माजी सरपंच वसंत उजगावकर व इतर मान्यवर उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत सिद्धेश ब्रीद युवा प्रतिष्ठान कडून करण्यात येणाऱ्या स्तुत्य उपक्रमाचे लोकांमध्ये कौतुक करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण सावंत यांनी केले.

चांगले काम करणाऱ्यांच्या मी सदैव पाठीशी उभा राहतो – पालकमंत्री उदय संबंध…

कडवईत मोफत खत वाटप कार्यक्रम — शेतकऱ्यांच्या मदतीसाठी युवा प्रतिष्ठानचा उपक्रम हा सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश ब्रिज यांचा स्तुत्य उपक्रम आहे.आज कडवई येथे श्री. सिद्धेश ब्रीद युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित मोफत खत वाटप कार्यक्रमास माननीय पालकमंत्री उदय सामंत उपस्थिती दर्शवली.जे शेतकरी बांधव प्रामाणिकपणे आणि मेहनतीने शेती करत आहेत, त्यांच्यासाठी खत वाटपाचा उपक्रम राबवून सिद्धेश आणि त्यांच्या टीमने एक समाजोपयोगी आणि काळाची गरज असलेला उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाबद्दल त्यांचे मनःपूर्वक कौतुक करतो.


आजचा कार्यक्रम हा केवळ वाटपापुरता मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकीचा उत्तम आदर्श आहे.गणेशोत्सव काळात चाकरमान्यांसाठी सुविधा असोत, बैलगाडा शर्यतीसारखे पारंपरिक उपक्रम असोत — सिद्धेशच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य सातत्याने घडत आहे.

आज उदय सामंत यांनी सिद्धेश ब्रिज शब्द दिला की, “जेव्हा चांगले कार्य असेल, तेव्हा मी तुमच्या पाठीशी नेहमी उभा राहीन.” असे महत्त्वाचे विधान पालकमंत्री यांनी केले.

कोणतीही निवडणूक लढण्याचा निर्णय केलेला नाही सामाजिक कार्याला राजकीय दृष्टिकोनातून बघू नये

गेली तीन वर्षे मी मोफत खत वाटप करतोय. शेतकऱ्यांच्या वेळेवर खत भेटत नाही. गेले तीन वर्षे योग्य नियोजन करून मी खत त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. दीड हजार लोकांचे खत वाटपाचा कार्यक्रम कडवई जिल्हा परिषद गटात मी ठेवला आहे. मी राजकीय दृष्ट्या कोणताही कार्यक्रम राबवत नाही. मी समाजकार्य म्हणून  उपक्रम राबवलेले आहेत. अजून तरी कोणतीही इलेक्शन लढवायची माझी इच्छा नाही. मी लोकांना जे हवे त्या दृष्टिकोनातून समाज कार्य करतोय. लोक बैलगाडी स्पर्धेसाठी इच्छुक आहेत त्या दृष्टिकोनातून मी स्पर्धा घेतल्या. मी अनेक सामाजिक उपक्रम राबवतोय ते लोकांना आवडता आहेत. मोफत छत्री वाटप आणि इतर सामाजिक उपक्रम लोकांच्या गरजेनुसार मी राबवतो. त्याला राजकीय रंग देऊ नये.- सिद्धेश ब्रीद युवा नेते शिवसेना तथा सिद्धेश ब्रीद युवा प्रतिष्ठान रत्नागिरी

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page