दिवा शीळ मार्गावर तात्काळ पथदिवे लावा : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी

Spread the love

ठाणे : निलेश घाग दिवा-शिळ मुख्य रस्त्याला पथदिवे लावण्यात यावेत अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरप्रमुख सचिन पाटील यांनी केली आहे. दिवा शहरातील दिवा शिळ मुख्य रस्त्यावरील चंद्रांगण, सिद्दीविनायक वास्तू शिल्पी कॉम्प्लेक्स पासून जिव्हाळा हॉल, खर्डी पुल गाव पर्यंत मुख्य रस्त्याला पथदिवे अद्याप पालिकेने बसवलेले नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळेस सदर रहदारीच्या रस्त्यावर अंधार असतो. त्यामूळे खर्डी, डावले येथील नागरिकांना खास करून महिला वर्गाला रस्त्याने चालताना जीव मुठीत घेवून घरचा प्रवास करावा लागत आहे.

यापूर्वी दिवा परिसरात अनेक गुन्हे घडले आहेत परिणामी
नागरिकांच्या सुविधेसाठी तातडीने पदपथ दिवे लावण्यात यावेत अशी मागणी शहरप्रमुख सचिन पाटील यांनी आयुक्तांना पत्राद्वारे देण्यात आले. दिवा शीळ रस्त्यावरील पथदिव्यांच्या मागणीची दखल दिवा प्रभाग समितीने गांभीर्याने न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ठाकरे उ.ठा.बा गटाकडून प्रशासनाला देण्यात आला आहे.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page