पुणे-बंगळुरू महामार्गावर जांभूळवाडी येथे कंटेनरने ४ ते ५ वाहनांना उडवलं; दोघांचा जागीच मृत्यू..

Spread the love

पुणे- राज्यात दिवाळीचा सण आनंदात साजरा केला जात असताना पुणे शहरातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पुण्यातील जांभूळवाडी येथील दरी पुलावर शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास मोठा अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने ४ ते ५ वाहनांना धडक दिली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.

याशिवाय तीन ते चार जण जखमी झाल्याची प्राथामिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनांमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आलं. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुणे-बंगळुरू मार्गावर कात्रज येथील नव्या बोगद्याच्या आधी जांभूळवाडी येथे दरी पूल आहे. या ठिकाणी तीव्र वळण असल्याने सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास साताऱ्याच्या बाजूने येणाऱ्या एका भरधाव कंटेनरने मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ४ ते ५ वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती, की चारही वाहनांचा चक्काचूर झाला. अपघातानंतर कंटेनर भररस्त्यात उलटला. या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ३ ते ४ जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनांमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ऐन दिवाळीत कंटेनर अपघातात दोघांचा जीव गेल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page