लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पाच शहरांमध्ये हिंसा घडवण्याचा कट;

Spread the love

नागपूरः आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्त्वाच्या पाच शहरांमध्ये हिंसा घडवून आणण्याचा नक्षलवाद्यांचा कट आहे, अशी माहिती पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे.

मार्च महिन्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागेल. या दरम्यानच राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, गोंदिया आणि नागपूरमध्ये हिंसा घडवण्यासाठी शहरी नक्षलवादी कट रचत असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांच्या नक्षलविरोधी विभागाचे पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी याबाबत माहिती दिली.

पाटील म्हणाले की, शहरी माओवादाने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. बॅन असलेल्या युनायटेड फ्रंटच्या विंगने शहरी भागात संघटन करायला सुरुवात केली असून काही लोक विशिष्ट शहरांमध्ये पाठवले आहेत. त्यांच्या माध्यमातून शासनाविरोधात रोष निर्माण करण्यासाठी हिंसा घडवली जावू शकते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page