पावसामुळे नवी मुंबई-ठाणेकडे बसने प्रवास करणाऱ्या दिव्यातील प्रवाश्यांचे हाल: पहा विडीआे

Spread the love

हक्काच्या बसस्थानका अभावी दिवेकर प्रवाशी चिखलात तासनतास उभे


दिवा (सचिन ठिक) दिव्यातून ठाणे आणि नवीमुंबईकडे
कामानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाश्याचे भर पावसात हाल होत असून हक्काचा बसस्थानक नसल्याचा फटका नागरिकांना बसत आहे. दिवेकर नागरिकांना दिवा महोत्सव मैदानाजवळ पावसामुळे तुंबलेल्या पाण्यातून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र असून पालिका प्रशासनाने यावर तातडीची उपाययोजना म्हणून खडी टाकण्याची मागणी केली जात आहे.

ठाणे महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका
परिवहन सेवेच्या बस दिवा चौकात येतात. प्रवाशी संख्या लक्षात घेता या ठिकाणी नागरिकांना रांगेत उभे राहण्यासाठी व्यवस्था नाही. पर्यायी जागा म्हणुन दिवा महोत्सव मैदानाजवळ उभे राहून बस पकडण्यास सांगितले जाते. मात्र गेल्या चार दिवसांपासूनपडलेल्या मुसळधार पावसामुळे याठिकाणी मोठा पाणी साठाझाला आहे. यामुळे येथे बस थांबणेही कठीण झाले आहे. प्रवाश्यांना बस पकडण्यासाठी कसरत करावी लागत आहे. बाजूला चायनियजच्या दुकानांचा कचरा आणि बियरच्या बाटल्यांचा कचराही पायाखाली तुडवत प्रवास करावा लागतोय अशी दयनिय परिस्थिती आहे.

परिणामी दिवेकर नागरिकांचे हाल होत आहेत. अश्यावेळी कोणतीही शिस्त नसल्याने नागरिक बस पकडण्यासाठी झटापटी करीत आहेत. महिलांना बसमध्ये शिरणेही कठीण होत आहे. पावसामुळे बस लेट झाल्यास सकाळच्या दरम्यान मोठी गर्दी होऊन चेंगराचेंगरी होत आहे. दरम्यान हक्काचे बसस्थानक नसल्याने नागरिकांना मोठा फटका बसत असून लवरकच बसस्थानकाची निर्मिती करावी तसेच पावसाळ्यामुळे चिखलातून नागरिकांना प्रवास करावा लागत असल्याने तातडीचा उपाय म्हणुन खडी टाकावी अशी मागणी आता दिवेकर नागरिक करीत आहे

पहा सविस्तर…..दबाव वृत्त

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page