
नवी दिल्ली- केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीचे व्हिडिओ फुटेज आणि छायाचित्रे साठवण्याच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमांनुसार, निवडणूक प्रक्रियेतील सीसीटिव्ही व्हिडीओ फुटेज आता फक्त ४५ दिवसांपर्यंतच साठवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच निवडणुकीच्या निकालानंतर पुढील ४५ दिवसांनी निवडणुकीचे फुटेड नष्ट केले जातील. या निर्णय़ाविरोधात निवडणूक आयोगाकडे कोणतीही याचिका पोहचली नाही. तर तो डेटा नष्ट केला जाईल. असेही या नियमांत सांगण्यात आले आहे.
गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर काँग्रेसने संशय व्यक्त करत प्रश्नही उपस्थित केले होते. काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीवर गंभीर आक्षेप घेतले होते. मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदानाचा वाढलेल्या टक्क्यांवर त्यांनी प्रमुख आक्षेप घेतला होता. इतकेच नव्हे तर मतदानाचे व्हिडिओ फुटेज उपलब्ध करून दिले जावेत, अशी मागणीही त्यांनी केली होती.
आता सीसीटीव्ही फुटेज साठवण्याची वेळ मर्यादा ४५ दिवसांपर्यंत कमी करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत सीसीटीव्ही डेटा निवडणूक आयोगाकडे सुरक्षित राहील. जर या वेळेपर्यंत निवडणूक आयोगाकडे कोणतीही याचिका पोहोचली नाही, तर तो डेटा नष्ट केला जाऊ शकतो. दरम्यान, निवडणूक आयोगाने. मतदान केंद्रांवरील सीसीटीव्ही फूटेज आणि संग्रहित फोटो निवडणुकीनंतर ४५ दिवसांनी नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात आयोगाने सर्व राज्य निवडणूक आयोगांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयाची माहिती सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. एका इंग्रजी वत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, महत्त्वाची बाब म्हणजे, निवडणूक निवड प्रक्रियेचे व्हिडिओग्राफी आणि छायाचित्रण कायद्यानुसार अनिवार्य नाही, परंतु ते “अंतर्गत व्यवस्थापन साधन” म्हणून वापरले जाते. यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारच्या रेकॉर्डिंग ३ महिने ते १ वर्षापर्यंत सुरक्षित ठेवल्या जात होत्या.अलिकडच्या काळात झालेल्या सोशल मीडियावर आयोगाच्या रेकॉर्डिंगच्या माहितीच्या आधारे अनेक गैरसमज पसरवले जात होते. काही चुकीचे संदर्भ देत व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत.त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.