प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार अर्ज करण्याचे आवाहन…

Spread the love

रत्नागिरी, दि. 30 : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या “प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार” साठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ०२३५२ – २२०४६१ या नंबर वर संपर्क साधावा.

केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार दिला जातो. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार ज्या मुलांनी (वय ५ पेक्षा अधिक व १८ वर्षापर्यंतच्या) शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यापूर्ण कामगिरी केलेली आहे, त्यांना हा पुरस्कार दिला जातो.

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५ करिता केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत. अर्ज (http://awards.gov.in) या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने स्विकारले जाणार आहेत. ज्या मुलांचे वय ०५ पेक्षा आधिक व ३१ जुलै, २०२४ रोजी १८ वर्षांपेक्षा कमी आहे व ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे, त्यांचे प्रस्ताव वरील संकेतस्थळावर स्वतः मुले किंवा त्यांचे वतीने राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, जिल्हाधिकारी/ जिल्हादंडाधिकारी, पंचायत राज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था इ. अर्ज करू शकतात. जिल्ह्यातील अशा प्रकारच्या जास्तीत जास्त मुलांचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page