दातिवली तलावाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करा,दिवा भाजपची मागणी

Spread the love

दिवा:- दातिवली तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामात निकृष्ट दर्जाचे काम झाले असून या ठिकाणी गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप करत दिवा भाजपचे मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

दातिवली तलावाच्या सुशोभीकरणावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला. मात्र पहिल्याच पावसात या तलावाच्या सुशोभीकरणासाठी बांधण्यात आलेला संरक्षक कट्टा कोसळला असून हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप रोहिदास मुंडे यांनी केला आहे. या कामाची चौकशी करून ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपचे रोहिदास मुंडे व महिला अध्यक्षा ज्योती पाटील यांनी केली आहे.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page