मोठी बातमी! बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा, दिल्लीत उच्चायुक्तायल सुरू करण्याची विनंती…

Spread the love

संयुक्त राष्ट्रांनी बलुचिस्तानमध्ये शांती सेना पाठवून पाकिस्तानी सैन्याला माघारी जाण्यास भाग पाडावं अशी मागमी बलोच लिबरेशन आर्मीककडून (Baloch Liberation Army) करण्यात आली.


मोठी बातमी! बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा, दिल्लीत उच्चायुक्तायल सुरू करण्याची विनंती..

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला ऑपरेशन सिंदूरच्या (Operation Sindoor) माध्यमातून दणका दिल्यानंतर आता बलुचिस्तानध्येही (Balochistan) त्याचे पडसाद पडत असल्याचं दिसून येतंय. एकीकडे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू असताना दुसरीकडे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा (Republic of Balochistan) करण्यात आली आहे. बलोच नेता मीर यार बलोच (Mir Yar Baloch) याने रिपब्लिक ऑफ बलुचिस्तानची घोषणा करत पाकिस्तानपासून स्वातंत्र झाल्याची घोषणा केली. सोशल मीडियावरही हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात सुरू आहे.


दिल्लीमध्ये स्वतंत्र उच्चायुक्तायल सुरू करण्याची मागणी
मीर यार बलोच हा एक लेखक आणि स्वतंत्र बलुचिस्तानसाठी लढणाऱ्या बलोच लिबरेशन आर्मीचा (Baloch Liberation Army) नेता आहे.  त्याने पाकिस्तानपासून बलुचिस्तान स्वातंत्र झाल्याचं घोषित केलं. नवी दिल्लीमध्ये बलुचिस्तानचे स्वतंत्र उच्चायुक्त सुरू करण्यात यावं अशी मागणी त्याने भारताकडे केली आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांनी त्यांची शांती सेना ही बलुचिस्तानमध्ये पाठवावी आणि पाकिस्तानच्या सैन्याला त्यांच्या सीमेत धाडावे अशी मागणीही त्याने केली आहे.

भारताने 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि पाकिस्तानच्या नऊ ठिकाणी हल्ले केले. या नऊ ठिकाणी दहशतवाद्यांची तळे होती आणि ती भारताने उद्ध्वस्त केली. त्यामध्ये 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले. त्याचवेळी भारताच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या एअर बेसचेही मोठं नुकसान झालं आणि त्यामध्ये 50 सैनिक ठार झाल्याची माहिती समोर आली.

पाकिस्तानपासून स्वातंत्र्याची घोषणा…

एकीकडे भारत आणि पाकिस्तानमध्ये हा तणाव वाढला असताना दुसरीकडे स्वतंत्र बलुचिस्तानसाठी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या. बलोच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या सैन्यावर हल्ला केला आणि त्यांना क्वेट्टा सोडण्यास भाग पाडले. त्यानंतर आता बलोच लिबरेशन आर्मीने स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा केली आहे.

आंतरराष्ट्रीय कर्जाचा वापर दहशतवादासाठी..

सीमेपलीकडील दहशतवाद आणि सरकारच्या हेतूवरून भारताने सातत्याने, पाकिस्तानला जगातून कोणतीही आर्थिक मदत मिळू नये म्हणून सर्व प्रयत्न केले. शक्य तेवढ्या जोरकसपणे पुराव्यांसह बाजू मांडली. पण पाकिस्तानने विस्कटलेल्या आर्थिक घडीचं कारण देत जगासमोर भीक मागत आपला कटोरा पसरला.

जागतिक बँकेनेही पाकमधील बिकट अवस्था पाहून पाझर फुटल्याप्रमाणे, एक अब्ज डॉलर्सचं कर्जही देऊ केलं. पण कंगाल पाकिस्तानचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे पुन्हा अधोरेखित झालं. मिळालेल्या पैशांमधून दोन वेळच्या अन्नासाठी रस्त्यावर भटकणाऱ्या जनतेला मदत करण्याऐवजी, पाकिस्तानने पुन्हा दहशतवाद्यांना कुरवाळलं.

भारताने उद्ध्वस्त केलेल्या दहशतवाद्यांच्या इमारती पाकिस्तानी सरकार पुन्हा बांधून देणार आहे. केवळ एवढंच नव्हे तर मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना एक कोटींची नुकसानभरपाई सुद्धा देण्याचं पाप शाहबाज शरीफ सरकार करणार आहे. त्यामुळे लोकांच्या डोक्यावर छत देण्याऐवजी, हजारो कुटुंबांचे हात रक्ताने माखलेल्या जैशच्या मुख्यालयासह, इतर दहशतवादी अड्डे पुन्हा बांधणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

सोशल मीडियावर पीओके मोकळे करण्याची मागणी…

अलिकडच्या काळात, बलोचने एका X पोस्टमध्ये लिहिले, “ब्रेकिंग न्यूज: १४ मे २०२५ बलुचिस्तान पाकिस्तानला पीओके रिकामा करण्यास सांगण्याच्या भारताच्या निर्णयाचे पूर्ण समर्थन करतो. ढाका येथे ९३००० सैन्य जवानांवर आत्मसमर्पणाचा आणखी एक अपमान टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानला ताबडतोब पीओके सोडण्यास उद्युक्त केले पाहिजे.”

“भारत पाकिस्तानी सैन्याला पराभूत करण्यास सक्षम आहे आणि जर पाकिस्तानने लक्ष दिले नाही तर रक्तपातासाठी फक्त पाकिस्तानी लोभी लष्करी जनरल जबाबदार असले पाहिजेत कारण इस्लामाबाद पीओकेच्या लोकांना मानवी ढाल म्हणून वापरत आहे,” असे त्यांनी लिहिले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page