
रत्नागिरी प्रतिनिधी – भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण देशभरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केले जाणार आहे. अहिल्यामाता होळकर यांचे कार्य हे समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि लोकांना माहिती होण्यासाठी मोठ्या स्तरावर हा कार्यक्रम राबवला जात आहे.
रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पक्ष कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत व अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी 18 मे रोजी जिल्हा कार्यालय येथे कार्यशाळा घेण्यात आली.
या बैठकीमध्ये प्रमुख उपस्थिती व्याख्यानकर्ते माजी आमदार श्री. प्रमोद जठार, जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत जिल्हा सरचिटणीस सौ. संगीता जाधव, भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष निलेशजी आखाडे, सौ.कवितके, सौ.रसाळ सर्व मंडल अध्यक्ष, आघाडी, प्रकोष्ठ जिल्हा संयोजक सर्व पदाधिकारी महीला व पुरुष उपस्थित होते.
व्याख्यानकर्ते श्री प्रमोद जठार यानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर व्याख्यान केले जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत यांनी सर्व कार्यक्रमाचे नियोजना बद्दल मार्गदर्शन केले व कोणकोणते कार्यक्रम जिल्हाभरात करायचे याबाबत नियोजन करण्यात आले. तसेच निलेश आखाडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर जीवनकथा मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.