
आयुष्य सुंदर बनवायचं असेल तर मनाला शांतता मिळेल,असं काही तरी करत रहा. गरजाच पूर्ण करत बसलात, तर आयुष्य असंच संपुन जाईल.आयुष्यात सर्व काही मिळते, पण आपण जे शोधतो, ते मात्र मिळत नाही. आयुष्य संपत जाते, शोध कार्य थांबत नाही आणि अंतिम क्षणी लक्षात येते की, जे बाहेर शोधत होतो, ते तर माझ्याच जवळ होते.
स्वतः सोबत जेव्हा दुसऱ्याच्या मनाचा देखील जेथे विचार केला जातो. तिथेच माणूसकीचं सुंदर नातं तयार होत असतं. लोभाने जवळ येणाऱ्या लोकांपेक्षा, माणुसकीने जवळ येणाऱ्या लोकांना जपा. आयुष्यात कधीच पश्चाताप होणार नाही. आयुष्य जगण्यासाठी नुसते, विचार असून चालत नाही,सुविचार पण असावे लागतात.आपण कसे दिसतो, ह्यापेक्षा कसे असतो, याला अधिक महत्त्व आहे.!
के. डी. सर. (ग्रंथपाल)
धाराशिव