पाकिस्तानचे तुकडे पडणार, एक तृतीयांश भागावर बलोच आर्मीचा कब्जा, पाकिस्तानी सैन्य चौक्या सोडून पळाले…

Spread the love

बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला सुरुवातीपासूनच भारताने पाठिंबा दिला आहे. आता भारताने केलेल्या कारवाईनंतर बलोच लिबरेशन आर्मिनेही पाकिस्तानला दणका दिला आहे.

पाकिस्तानचे तुकडे पडणार, एक तृतीयांश भागावर बलोच आर्मीचा कब्जा, पाकिस्तानी सैन्य चौक्या सोडून पळाले…


नवी दिल्ली : भारताच्या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानचे तुकडे पडणार हे निश्चित झालं आहे. कारण बलुचिस्तानच्या बलोच लिबरेशन आर्मीने (Balochistan Liberation Army BLA) पाकिस्तानच्या एक तृतीयांश भागावर कब्जा मिळवला आहे. बलोच आर्मीच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्य चौक्या सोडून पळाले. ही घटना म्हणजे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याकडे एक पाऊल असल्याची चर्चा आहे.

पाकिस्तानच्या कुरापतीला उत्तर देताना भारताने आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानवर हल्ला केला. लष्कर, नौदल आणि वायूदलाने संयुक्त कारवाई करत पाकिस्तानला पुरत नामोहरम केलं. त्यामुळे पाकिस्तान कोंडीत सापडला असताना बलुचिस्तामध्येही बंडखोरांनी तोंड वर काढलं.

*बलोल आर्मीचा पाकिस्तानवर हल्ला…*

बलुचिस्तानच्या बंडखोर बलोच आर्मीने (Balochistan Liberation Army BLA) पाकिस्तानवर गोळीबार केला. त्यामध्ये पाकिस्तानच्या सैन्याचा निभाव लागला नाही. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याने चौक्या सोडून पळून जाणं पसंत केलं. बलुचिस्तानच्या एक तृतीयांश भागावर कब्जा केल्याचा बलोच लिबरल आर्मीने दावा केला आहे. त्यामुळे स्वतंत्र बलुचिस्तानकडे टाकलेलं हे एक पाऊल आहे.

अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमेजवळील भाग बलोच आर्मीच्या ताब्यात गेला आहे. केच, मस्टंग आणि कच्छीमध्ये बलोच आर्मीने पाकिस्तानला पळवलं. गुरुवारी सकाळी बलोच आर्मीने पाकिस्तानच्या 14 सैनिकांना ब्लास्ट करून ठार केलं होतं. या आधी 11 मार्च 2025 मध्ये बलोच आर्मीने जाफर एक्स्प्रेसचंही अपहरण  केलं होतं.

बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला भारताचा पाठिंबा…

बलोच लोक हे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराणच्या काही भागात राहतात. त्यातील बहुतांश भाग हा पाकिस्तानच्या ताब्यात आहे. पाकिस्तानी सैन्याने बंदुकीच्या ताकदीवर बलुचिस्तानचा भाग ताब्यात ठेवला आहे. इथले लोक स्वातंत्र्य बलुचिस्तानची मागणी करत आहेत. त्यासाठी बलोच लिबरेशन आर्मीही स्थापन करण्यात आली आहे. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला भारताचा नेहमीच पाठिंबा राहिला आहे.

तुर्कीचे कार्गो विमान कराचीत…


भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्याचा मित्र तुर्की मदतीला आल्याचं चित्र आहे. पाकिस्तानमधील कराची विमानतळावर तुर्कीचे एक कार्गो विमान उतरले आहे. जम्मूमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर, या मालवाहू विमानात तुर्की ड्रोन असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एवढी वाताहत झाल्यानंतरही पाकिस्तानची कुरापत करण्याची सवय काही गेली नसल्याचं यावरून दिसतंय.

सांबा सेक्टरमध्ये जैशचे सात दहशतवादी ठार…

जम्मूच्या सांबा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न बीएसएफने उधळून लावला. बीएसएफच्या कारवाईत सात दहशतवादी ठार झाले. मिळालेल्या माहितीनुसार, 10 ते 12 जैश दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page