नेरळ- सुमित शिरसागर
आजाद समाज पार्टी आणि आधार अंध-अपंग संस्था नेरळ यांच्या संयुक्त विद्यनाने आज नेरळ ग्रामपंचायत कार्यलयावर विविध मागण्यांसाठी बेधडक मोर्चा काढण्यात आला होता.दिव्यांग नागरिकांना मिळणारा शासनाचा निधी हा गेली तीन वर्षे नेरळ ग्रामपंचायतीकडून देण्यात आला नाही शिवाय शासनाच्या दिव्यांग नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा ह्यादेखील मिळत नसून त्यांची माहिती दिली जात नाही असे अनेक प्रश्न घेऊन आजाद समाज पार्टी आणि आधार अंध-अपंग संस्था नेरळ यांच्या संयुक्त विद्यनाने हा मोर्चा काढण्यात आला होता.
रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत असलेली कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत सध्या आर्थिक कोंडीत सापडलेली दिसून येत आहे.करोडो रुपयांची उलाढाल होणाऱ्या या नेरळ ग्रामपंचायत मध्ये मात्र सफाई कामगारांना मागील नऊ महिन्याचा पगार मिळालेला नाही तर आता शासनाकडून दिव्यांग नागरिकांना ग्रामपंचायतीच्या जमा खर्चाच्या माध्यमातून पाच टक्के दिला जाणारा निधी देखील मिळाला नसल्याची बाब समोर आली.वर्षाकाठी पाच हजार मिळणारे हे मानधन गेली तीन वर्षे या दिव्यांग नागरिकांना मिळाले नसल्याचे दिव्यांग नागरिकांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं.
दरम्यान 2015 ते 2021 या कालावधीत गावातील दिव्यांग नागरिकांवर पाच टक्के निधी खर्च करण्यात आला होता त्याचा तपशील देखील माहितीचा अधिकार वापरून या दिव्यांग नागरिकांनी माहिती मिळवली असता त्यावर काही आक्षेप घेण्यात आला असून शासनाकडून दिव्यांग नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांचा व विविध मागण्या घेवून आज आजाद समाज पार्टी आणि आधार अंध-अपंग संस्था नेरळ यांच्या संयुक्त विद्यमाने नेरळ ग्रामपंचायत कार्यलयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता.यावेळी
आजाद समाज पार्टी महाराष्ट्र उपाध्यक्ष अडव्हॉकेट सुमित साबळे,संस्थापक अंध अपंग संस्था वारे अध्यक्ष अरुण जोशी,रवींद्र वझरकर,सुनील राजे सामाजिक कार्यकर्ते सिध्यार्थ सदावर्ते यांसह संघटनेचे पदाधिकारी,दिव्यांग नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर यावेळी आंदोलन कर्त्यांनी विविध मागण्याचे पत्रक नेरळ ग्रामपंचायत सरपंच उषा पारधी,ग्रामसेवक राठोड,तर सदस्य यांच्या कडे दिले.
दरम्यान विविध मागण्या घेवून आलेल्या आजाद समाज पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सुमित साबळे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितलं की आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीन डिसेंबर रोजी आम्ही उपोषण करणार होतो परंतु ग्रामपंचायत सरपंच,सदस्य,ग्रामसेवक यांनी सकारात्मक चर्चा केली असून काही मागण्या ह्या येणाऱ्या मीटिंग मध्ये घेवून त्यावर ही तोडगा काढला जाणार आहे,तर मागील तीन वर्षे दिव्यांग नागरिकांना निधी मिळालेला नाही त्याचा अर्धा निधी आम्ही डिसेंबर च्या 15 तारखेच्या आत देण्याचे कबूल केले आहे,तर उर्वरित निधी मार्च महिन्यात देण्यात येणार असल्याने तीन डिसेंबर रोजी करण्यात येणारे उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.