
रत्नागिरी : रत्नागिरीतील शांतीनगर – नाचणे येथील एका पतपेढीत काम करणाऱ्या व्यक्तीने फायनान्स कंपन्यांच्या जाचाला कंटाळून गवत मारण्याचे औषध घेऊन आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरीतील शांतीनगर – नाचणे येथे राहणाऱ्या शशिकांत आप्पा तेली वय ४८ यांनी काढलेले कर्ज भरण्यासाठी वारंवार तगादा लावला गेल्याने शशिकांत तेली यांनी सोमवारी गवत मारण्याचे औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. याची नोंद जिल्हा रूग्णालयातील पोलीस चौकीत करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.