कर्जत खालापूर मधली गद्दारी संपवायची आहे – आदित्य ठाकरे….काल शंकराचार्य यांचे दर्शन घेतलं, आज जनतेचे दर्शन घेण्यासाठी आपल्यासमोर…

Spread the love

कर्जत: सुमित क्षीरसागर – शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, मा. आमदार, श्री. आदित्यजी ठाकरे यांच्या उपस्थितीत कर्जत (रायगड) येथे  भव्य शिवसैनिक मेळावा संपन्न झाला . या मेळाव्याला हजारो शिवसैनिकांनी उपस्थिती लावली होती . यावेळी ‘५० खोके एकदम ओके झालं होतं, त्यावेळी उद्धव साहेबांनी आम्हाला बाहेर पडा असे सांगितले . आम्ही जनतेला भेटलो, जनतेचे आशीर्वाद घेतले तेव्हा मुंबई बाहेरची पहिली सभा कर्जत मध्ये झाली होती . आजही कर्जत मध्ये सभा होत आहे . आणि कर्जत खालापूर मधली गद्दारी आता आपल्याला संपवायची आहे . या गद्दारांना लोकसभेत धडा शिकवला आहे , आत्ता विधानसभेला धडा शिकवणार , ही गद्दारी फक्त शिवसैनिकांसोबत नाही तर महाराष्ट्र सोबत आहे’. असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला .

काल शंकराचार्य यांचे दर्शन घेतलं, आज जनतेचे दर्शन घेण्यासाठी आपल्यासमोर

               
काल शंकराचार्य यांचे दर्शन घेतलं . आज जनतेचे दर्शन घेण्यासाठी आपल्यासमोर आलो आहे . धर्मात सर्वात मोठे पाप हे विश्वासघाताच असतं . जो विश्वासघात करतो तो हिंदूच नाही .बाळासाहेब ठाकरे यांचे असलेले प्रेम यामुळे शंकराचार्य मातोश्रीत आले होते . आमचं हिंदुत्व हे घर पेटवणारं नाही , तर घरात चूल पेटवणारं आहे .

आपण भाजपाला संविधान बदलण्यापासून रोखला

            
केंद्र सरकार आणि भाजपा टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले की ‘या पूर्वी भाजप सरकार, मोदी सरकार म्हणत होते, ते आता एनडीए सरकारवर आलेत . यांना संविधान बदलायचं होतं . आता याला फेक नेरेटिव्ह म्हणत आहेत . पण आपण आंबेडकर प्रेमी, देशभक्त जनता होतो . हे जर बहुमतात आले असते तर तुमचा आमचा आवाज दाबला असता . आपण भाजपाला संविधान बदलण्यापासून रोखलं आहे . पहिला टप्पा आपण यशस्वी पार पाडला , आता दुसरा टप्पा महत्त्वाचा आहे . केंद्रात खेळ कधीही होऊ शकतो , पण आपलं सरकार येणार हा विश्वास आहे’.

दोन वर्षात राज्यात घटनाबाह्य सरकार सुरू आहे

             
राज्यात गेल्या दोन वर्षापासून घटनाबाह्य सरकार सुरू आहे . जोपर्यंत हे बाद होत नाही तोपर्यंत हे घटनाबाह्य आहेत . चाळीस चोर गद्दार निवडणूक न लढता मुख्यमंत्री कसं बसवू शकतात ? हे संविधान विरोधी कृती आहे . यांच्यात महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्याची हिंमत नाही . पुढचे तीन महिने या गद्दार सरकारला माहित आहे,  त्यांची हार पक्की आहे . त्यामुळे सर्व यंत्रणा वापरतील . पण महाराष्ट्र यांना हकलून लावणार .

जर चुकून उद्या यांचं सरकार आलं, तर मंत्रालयही गुजरातला हलवतील

              
राज्य सरकार आणि महा युतीवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले की ‘महाराष्ट्र मुंबई लुटण्याचे काम सुरू आहे . डिव्हाइड आणि रुल ही यांची पद्धत आहे . जाती जाती धर्म धर्मात हे भांडण लावतील . आरक्षणावरून वाद निर्माण करतील . पण आमच्या नोकऱ्यांचं काय ? जर चुकून उद्या यांच सरकार आलं तर हे मंत्रालयही गुजरातला हलवतील . उद्योग ही तिकडे हलवतील . कामगार कायदेही बदलणार आहेत . पण भाजपच्या जे मनात आहे ते आपल्याला रोखायचं आहे’.

शिवसेनेचे नेते -युवासेना प्रमुख मा.आदित्यजी ठाकरे यांच्या मुख्य उपस्थितीत कर्जत – खालापूर विधानसभा याठिकाणी शिवसंपर्क अभियान संवाद दौरा निष्ठावंत शिवसैनिकांच्या उपस्थितीत यशस्वीपणे पार पडला…..
यावेळी उपस्थित शिवसेना उपनेत्या महिला संपर्कप्रमुख किशोरीताई पेडणेकर, आमदार सचिन अहिर, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील जी, मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे जी, कर्जत खालापूर विधानसभेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत जी, युवासेना कार्यकारणी सदस्य पवन जाधव जी व शिवसैनिक उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page