
ठाणे : प्रतिनिधी दिवा विभागात नुकत्याच पार पडलेल्या मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात सियाराम विश्वकर्मा (५५) यांना विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्या कुटुंबियांचे भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अमरजीत मिश्रा यांनी दिव्यातील त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले. याशिवाय त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ५० हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी दिवा मंडळातील मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे, दिलीप भोईर, युवराज यादव, सचिन भोईर, ज्योती पाटील ,रोशन भगत, डॉ. विद्यासागर दुबे, जीलाजित तिवारी, राहुल शाहू, वीरेंद्र गुप्ता, अवधराज राजभर, प्रशांत आंबोनकार, अमन गुप्ता
आदी कार्यकर्ते उपस्थित होते.