लग्न करण्याबद्दल स्पष्टच बोलली गायिका आर्या आंबेकर, म्हणाली- ‘कार्तिकी गायकवाडमुळे…’

Spread the love

मुंबई: सारेगमप लिटिल चॅम्प्सचं पर्व संपून कित्येक वर्षे लोटली आहेत. त्या पर्वातील अंतिम फेरीत पोहोचलेले पंचरत्न म्हणजे आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, रोहित राऊत, प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. उलट नुकत्याच झालेल्या सागेमप लिटिल चॅम्प स्पर्धेत हे पाचही जण परीक्षक म्हणून सहभागी झाले होते.

या पंचरत्नांपैकी कार्तिकी गायकवाड आणि रोहित राऊत यांचे दोनाचे चार हात झाले आहेत. त्यामुळे आता बाकीच्यांचं लग्न कधी होणार याची सर्वांना उत्सुकता आहे. आपल्या गोड आवाजानं रसिकांना आर्या आंबेकर हिनं मंत्रमुग्ध केलं आहे. आर्या लवकरच लग्न करणार असल्याची सातत्यानं बातम्या येत होत्या. या सर्व अफवांवर आर्यानं एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.

काय म्हणाली आर्या

गाण्याप्रमाणंच आर्यानं अभिनय क्षेत्रातदेखील तिचं नशीब आजमावलं आहे. ‘ती सध्या काय करते’ या सिनेमात काम केलं होतं. त्या सिनेमातील कामामुळे आर्याच्या चाहत्यांची संख्येत लक्षणीय वाढ झाली. मीडिया रिपोर्टनुसार, एका मुलाखतीत आर्याला तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिनं फारच गंमतीशीर उत्तर दिलं.

आर्यानं सांगितलं की, ‘मी यावर्षी खरंच लग्न करत नाहीये. माझ्या लग्नाच्या बातम्या सातत्यानं येण्यामागे जबाबदार आहे ती कार्तिकी गायकवाड. आमच्या पाच लिटिल चॅम्प्सपैकी कार्तिकी गायकवाडनं सगळ्यात आधी लग्न केलं. त्यामुळे सर्वजण माझ्या मागे लग्न करण्यासाठी लागले आहेत. त्यातूनच माझ्या लग्नाच्या अफवा पसरत आहेत. सध्या तरी माझा लग्नाचा अजिबातच विचार नाही.’ असं आर्यानं सांगितलं.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page