
रत्नागिरी : रत्नागिरी शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला असून रत्नदुर्ग किल्ला, पतित पावन मंदिर, थिबा राजवाडा यांसारख्या ऐतिहासिक वास्तूंपैकी एक असलेल्या लोकमान्य टिळक जन्मस्थानाचे महत्त्व मोठे आहे.
देशभरातून मोठ्या संख्येने पर्यटक या वास्तूला भेट देतात. ही बाब लक्षात घेऊन सामंत यांच्या पुढाकाराने या जन्मस्थानाचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
अत्यंत दिमाखात उभी असलेली ही ऐतिहासिक वास्तू आता आणखी एका नव्या उपक्रमासाठी सज्ज झाली असून, येथे रविवारी, ५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता ‘पुस्तक दालन’ आणि ग्रंथ भेट कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे.
या वास्तूला भेट देणाऱ्या पर्यटकांना, इतिहासप्रेमींना, विद्यार्थ्यांना आणि स्थानिकांना आता मोठ्या प्रमाणावर माहितीपर साहित्य वाचनासाठी उपलब्ध होणार आहे

सामंत यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे चरित्र, बालसाहित्य, ऐतिहासिक, माहितीपर, कवितासंग्रह आणि लेखसंग्रह अशी विविध विषयांवरील एक हजारांहून अधिक पुस्तके या दालनात उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
टिळक जन्मभूमी आवारातील एका इमारतीमध्ये या वाचन उपक्रमाची सुरुवात होत आहे. वाचन संस्कृतीला चालना देणाऱ्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*