भारताला पराभवाचा झटका; आफ्रिकेने टीम इंडियाचा विजयी रथ रोखला; अहमदाबादचे मैदान भारतीय संघासाठी ‘अनलकी’?

Spread the love

अहमदाबाद- अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आणि भारतीय चाहत्यांचे तुटलेले हृदय… हे समीकरण जणू आता पाचवीलाच पुजलंय. 2023 च्या वनडे वर्ल्ड कप फायनलमधील त्या पराभवाच्या आठवणी अजून पुसल्या गेल्या नव्हत्या, तोच याच मैदानावर आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या सुपर-8 च्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 76 धावांनी धुव्वा उडवला. या पराभवासोबतच भारताची सेमीफायनलची वाट बिकट झाली असून, अहमदाबादचे मैदान भारतीय संघासाठी ‘अनलकी’ ठरत असल्याच्या चर्चांना आता उधाण आले आहे.

सुपर-8 सामन्यात भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अतिशय खराब झाली. अवघ्या 20 धावांवर संघाने तीन महत्त्वाचे बळी गमावले. जसप्रीत बुमराह याने क्विंटन डी कॉकला 6 धावांवर बाद केले. त्यानंतर तिसऱ्या षटकात अर्शदीप सिंगने कर्णधार एडेन मार्करमला केवळ 4 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. चौथ्या षटकात पुन्हा बुमराहने रयान रिकेल्टनला 7 धावांवर बाद करत दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का दिला. यानंतर डेवाल्ड ब्रेविस आणि डेव्हिड मिलर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी करत संघाचा डाव 1000 धावांच्या पार नेला. मात्र, शिवम दुबेने ब्रेविसला बाद करत ही जोडी फोडली. ब्रेविसने 29 चेंडूत 45 धावांची आक्रमक खेळी केली, यात 3 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.

दरम्यान, डेव्हिड मिलरनेही तुफानी फलंदाजी करत 35 चेंडूत 63 धावा केल्या. त्याच्या खेळीत 7 चौकार आणि 3 षटकार होते. अखेरीस त्याला वरुण चक्रवर्तीने बाद केले. शेवटच्या षटकांत ट्रिस्टन स्टब्सने 24 चेंडूत नाबाद 44 धावांची झंझावाती खेळी करत संघाचा डाव 187 धावांपर्यंत पोहोचवला. त्याने 1 चौकार आणि 3 षटकार लगावले. भारताकडून बुमराहने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर अर्शदीप सिंगने 2 विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 1 बळी घेत दक्षिण आफ्रिकेचा डाव रोखला.

188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. पॉवरप्लेच्या 6 षटकाअखेर भारताने 31 धावांवर आपले 3 महत्त्वाचे फलंदाज गमावले आहेत. सलामीवीर ईशान किशन शून्यावर बाद झाला, तर तिलक वर्मा (1) आणि अभिषेक शर्मा (15) हे देखील झटपट माघारी परतले. त्यानंतर या पाठोपाठ वॉशिंग्टन सुंदरदेखील बाद झाला असून त्याने 11 चेंडूत 11 धावा केल्या. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने सुपर-8 च्या गुणतालिकेत (Points Table) आपले खाते उघडले असून 2 गुण पटकावले आहेत. भारतासाठी हा पराभव मोठा धक्का मानला जात आहे. आता उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारतासाठी पुढचे सर्व सामने ‘करो या मरो’ अशा स्थितीतील असतील.

26 फेब्रुवारी – झिम्बाब्बे विरुद्ध, चेन्नई

1 मार्च – वेस्ट इंडिज विरुद्ध, कोलकाता

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page