रत्नागिरी मध्ये ‘उबाठा’चा महावितरणवर जनआक्रोश मोर्चा….

Spread the love

रत्नागिरी : स्मार्ट वीज मीटर हा सर्वसामान्य ग्राहकांना लुबाडण्याचे षडयंत्र असून, या मीटरमुळे वीज बिलांमध्ये कमीत कमी पाचशे रुपयांनी वाढ झाल्याने जिल्ह्यात वर्षाला १८० कोटींची लूट होणार आहे. यातील पैसा हा अदानींच्या घशात जाणार आहेत, असा आरोप करत, हे वीजमीटर चोरीछुपे बसवले जात असून, यापुढे अशापध्दतीने वीज मीटर बसवणाऱ्यांचा बंदोबस्त करावा लागेल, असा इशारा शिवसेना उबाठाचे सचिव व माजी खासदार विनायक राऊत यांनी दिला.
     

महावितरणच्या स्मार्ट वीज मीटर विरोधात उबाठाच्यावतीने मंगळवारी माजी खासदार विनायक राऊत यांच्या कार्यालयातून महावितरणच्या कार्यालयावर धडक जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी राऊत हे मोर्चात आघाडीवर होते. यावेळी शिवसेना ‘उबाठा’चे उपनेते आणि माजी आमदार बाळ माने, जिल्हाप्रमुख दत्ता कदम, रत्नागिरी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, शहर संघटक प्रसाद सावंत, राजापूरचे तालुकाप्रमुख कमलाकर कदम, देवरुखचे छोट्या गव्हाणकर, तात्या सरवणकर, माजी जि. प. अध्यक्षा स्वरुपा साळवी, माजी नगरसेविका रशिदा गोदड, महिला संघटक ममता जोशी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ‘उबाठा’ पक्षाच्यावतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महायुतीसह महावितरणच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. वीज मीटर चोरीछुपे बसवले जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त झाली.


     

महावितरणच्या कार्यालयावर धडक दिल्यानंतर माजी खास . विनायक राऊत म्हणाले की, यापूर्वी मीटरच्या बाबत तक्रारी होत्या. पण
महाराष्ट्रात सरकारच्या विविध वितरण कंपनीने बसवलेल्या मीटर चुकीचे रीडिंग करायचा. पण त्याच्यावर आमचा विश्वास होता. पण या स्मार्ट मीटरची आयडिया आहे, या राज्यकर्त्यांची नाही, पंतप्रधानांची नाही, मुख्यमंत्र्यांचे नाही तर मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन करणारे ज्यांचे नाव तुम्ही ऐकलं असाल त्या अदानीच्या मार्फत त्या स्मार्ट मीटरची निर्मिती केली गेलेली आहे आणि अदानी केवळ संपूर्ण महाराष्ट्र लुटायला बसलाय. एवढेच नव्हे तर आपल्या संगमेश्वर तालुक्यातल्या सह्याद्री पट्ट्यातल्या शेकडो एकर जमिनी गोरगरिबांच्या दलालाने बोगस खरेदीखत करून केव्हा लुटल्या हे लोकांना माहिती पडलं नाही, हे आपल्या महाराष्ट्राचा दुर्दैव असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देण्यात आले. स्मार्ट मीटर बसवणे बंद न झाल्यास पालकमंत्र्यांच्या घरावर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t  कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा.

आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..

“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी  7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav  वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page