
दापोली : मुसळधार पावसामुळे तालुक्यातील पाजपंढरी गावातील लोकांना दरडीचा व समुद्री उधाणाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे १२५ कुटुंबांना स्थलांतरित होण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे.
घरांवर दरड कोसळण्याची भीती असल्याने आम्ही जीव मुठीत घेऊन जगतोय, असे येथील एका रहिवाशाने सांगितले. प्रशासनाने घरे खाली करण्याचा आदेश दिला असला तरी जायचे कोठे, असा मोठा प्रश्न ग्रामस्थांसमोर आहे.
एकीकडे मुसळधार पावसामुळे दरडींचा धोका कायमस्वरूपी टांगता आहे. त्याचवेळी पावसाळ्यात समुद्र अधिक खवळलेला असतो आणि उधाणाची भरती अधिक मोठी येते. त्यामुळे त्याचाही धोका या ग्रामस्थांना आहे. त्यामुळे या गावातील १२५ कुटुंबांना आपली घरे सोडून स्थलांतरित होण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे.