
Vasai : वसई, विरार, पालघर डहाणू येथील नागरिकांसाठी गुड न्यूज आहे. येथील नागरिकांना नवी मुंबई, उरणला जाण्यासाठी आता तीन गाड्या बदलाव्या लागणार नाहीत, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या मार्गावरील मेट्रोबाबत मोठा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा मेट्रो मार्ग विरारपर्यंत नेण्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता वसई विरार मधील नागरिकांना दळणवळणाचे आणखी एक साधन उपलब्ध होणार आहे.
वसई, विरार पालघर डहाण येथील नागरिकांना नवीमुंबई,उरण याठिकाणी जाण्यासाठी त्यांना सध्या जवळपास तीन गाड्या बदलाव्या लागतात. त्यावर उपाय म्हणून सरकारने मल्टी कॉरिडॉरचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावात रस्ता आणि मेट्रोचा समावेश आहे. हा मार्ग ‘जेएनपीटी ते नायगाव’ असा होता. काल झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत हा मार्ग विरारपर्यंत नेण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.