
मुंबई : – रत्नागिरी जिल्हयातील बारसू- सोलगांव रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात मुंबई येथे २० जुलैला महामोर्चा काढण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या परळ येथील बैठकीत घेण्यात आला . बारसू – सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटना आणि बारसु रिफायनरी विरोधी राज्यव्यापी समिती यांच्या संयुक्त आयोजनात राणीची बाग ते आझाद मैदान असा महामोर्चा होणार आहे , अशी माहिती बारसू – सोलगांव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र जोशी यांनी दिली . या मोर्चाला राज्यभरातून सुमारे ५० हजार ते १ लाख नागरिक सहभागी होणार आहेत . यासाठी प्रचार व प्रसार समिती स्थापन करण्यात आली . बैठकीला डॉ . भारत पाटणकर , सत्यजीत चव्हाण , दीपक जोशी अंकुश कदम , संपत देसाई , नितीन जठार संतोष तिरलोटकर , चंद्रकांत सोडये , प्रकाश रेड्डी, मिलिंद रानडे , विनायक शिंदे , वैभव कोळवणकर , शामा नवाळे , गोवळचे गावकार , बबन पुजारी , शशी सोनवणे , अनिता भट्टाचार्य आदी उपस्थित होते .