आरपीफ जवानाच्या आपसात वादात जयपुर मुंबई पॅसेंजरमध्ये गोळीबार,
घटनेत ४ जणांचा मृत्यू

Spread the love

आरपीफ जवानाच्या आपसात वादात जयपुर मुंबई पॅसेंजरमध्ये गोळीबार,
घटनेत ४ जणांचा मृत्यू

दहिसर ते मीरा रोडदरम्यान एक्स्प्रेसमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहीती आहे. तर या घटनेत एका पोलीसाचा देखील मृत्यू झाला आहे. जयपुर मुंबई पॅसेंजरमध्ये हा गोळीबार झाला आहे.आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पालघर रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडल्यीची माहीती आहे. या घटनेत एका पोलीसासह ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबार झाल्यानंतर एक्स्प्रेस मीरा-रोड दहिसर येथे थांबवण्यात आली आहे ट्रेन गुजरातमधून महाराष्ट्रातील पालघरमध्ये दाखल होताच या ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याची माहिती आहे. या गोळीबारात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर काही प्रवासी जखमी झाल्याचीही प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळतात जीआरपी पोलीस आणि आरपीएफ पोलीस घटनास्थळावर दाखल झाले आहेत. ते घटनेचा अधिक तपास करत आहेत. सध्या ही मुंबई सेंट्रल येथे थांबवण्यात आली आहे.
गाडी नंबर 12957 मध्ये साडेपाच वाजण्याच्या सुमाराला गोळीबाराची घटना घडली.या गाडीतील कोच B 5 मध्ये गोळीबाराची घटना घडली असून आरपीफ जवानाचा आपसात वाद झाल्यामुळे ही घटना घडली असून कॉन्स्टेबल चेतन कुमार याने हा गोळीबार केला असल्याची माहिती समोर आली आहे..

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page