तात्काळ पंचनामे करून संरक्षक भिंत बांधण्यासाठी भाजप तालुकाध्यक्ष दादा दळी यांची आग्रही मागणी.

जनशक्तीचा दबाव न्यूज | रत्नागिरी | ऑक्टोबर ०५, २०२३.
या विषयी सविस्तर वृत्त असे की दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी पडलेल्या अतिमुसळधार पावसाने काजरघाटी, पिलणकरवाडी येथे भुस्खलन झाल्याने सौ. कोमल पिलणकर, श्री. विजय पिलणकर, श्री. सचिन पिलणकर, श्री. राकेश पिलणकर आदी नागरिकांच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. याबाबत मा. जिल्हाधिकारी व मा. तहसीलदार श्री. म्हात्रे साहेब यांना भाजप तालुकाध्यक्ष दादा दळी यांनी निवेदन देऊन तात्काळ महसूल खात्याने पंचनामा करून कोणतीही जीवित वा वित्त हानी होऊ नये म्हणून संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी आग्रही मागणी केली आहे.
यावेळी भाजपा रत्नागिरी (दक्षिण) जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत यांनी तहसीलदार श्री. म्हात्रे यांना “आपण स्वतः लक्ष घालावे व तातडीने आवश्यक ती उपाययोजना करावी” या आशयाची मागणी केली आहे. सोबत जिल्हा सरचिटणीस श्री. सतेज नलावडे, जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रशांत डिंगणकर, तालुका उपाध्यक्ष श्री. दिलीप पटवर्धन, सरचिटणीस श्री. सुशांत पाटकर, किसान मोर्चाचे जिल्हा संयोजक श्री. ज्ञानेश पोतकार, श्री. अशोक वाडेकर, किसान आघाडीचे तालुका संयोजक श्री. जगन्नाथ पवार, पिलणकर वाडीतील आपत्तीग्रस्त ग्रामस्थ व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.